*माऊलींची पालखी आळंदीत दाखल होताच प्रसन्नता चैतन्य आळंदीकर ग्रामस्थ यांनी अनुभवले*

*माऊलींचा जयघोषात अवघी आळंदी दुमदुमली*
*माऊलींची पालखी आळंदीत दाखल होताच प्रसन्नता चैतन्य आळंदीकर ग्रामस्थ यांनी अनुभवले*
आळंदीत माउलींच्या पालखीचे आज आगमन झाले, तो उस्ताह पाहून माऊली तुकाराम नाम घेत प्रत्येक जण आपोआप ठेका धरताना समस्त समाजाने अनुभवला, माऊलीच्या आषाढी वारी ला सुरावात होऊन तब्बल ३२ दिवस झाले,मजल दर मजल माऊली नाम घेत ,वारकरी समाजाच्या प्रत्येक घटकाने, विठुरायाच्या चरणी सर्वस्व अर्पण करत तृप होत पुन्हा आळंदी आज गाठलीय, जागतिक महामारी च्या संकटाने विरह सहन करत साजरा होणारा पालखी सोहळा वेगळा होता , ती आठवण ही नको अश्या परिस्थितीत माऊली माऊली म्हणणारा वारकरी समाजा चैतन्य संचारत आज आळंदीत दाखल झाला, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विस्वस्त ॲड ,, विकास ढगे ,व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी प्रशासक अंकुश जाधव यांचे प्रतिनिधि म्हणून श्री किशोर तरकसे, आळंदी पोलिस निरीक्षक श्री रमेश पाटील, गोपनीय बारनिशी आळंदी पोलिस श्री मच्छिंद्र शेंडे, पी आय श्री, बी एम जोंधळे, आळंदी कर ग्रामस्थ , वारकरी समाजाच्या माऊली जयघोषाने माऊली आळंदीत दाखल झाली, पालखी सोहळा मालक श्री राजेंद्र अर्फळकर यांचे कडून माउलींच्या पादुका प्रदक्षिणा घालून विस्वस्तांच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या, वीणा मंडपातून माऊली मूळ स्तानी विराजमान होत पालखी सोहळा आरती मंत्र जप करत थांबला, हजेरी मारूती मंदिरात प्रथा परंपरेने पालखीची हजेरी माऊलींचे चोपदार बाळा साहेब रणदिवे हे घेत पालखी सोहळा संपन्न होईल, हभप चक्रांकित महाराज यांच्या नरसिंह सरस्वती स्वामी मठयांचे वतीने वर्षानुवर्ष भाविकांना मिळणाऱ्या पिठलं भाकरी रूपाचा माऊलींचा प्रसाद घेत भाविक तृप्त होताना दिसून आलें,