आळंदी नगरपरिषद मार्फत १०० वृक्षांची लागवड !*माझी वसुंधरा ४.० अभियानाची उत्तम सुरुवात.

*आळंदी नगरपरिषद मार्फत १०० वृक्षांची लागवड !*माझी वसुंधरा ४.० अभियानाची उत्तम सुरुवात.
पर्यावरण संवर्धनासाठी अग्नी,वायू, जल,आकाश,पृथ्वी या पाच तत्वावर आधारित “माझी वसुंधरा” हे अभियान राज्य शासना मार्फत राज्यभर दरवर्षी राबविल जात. आळंदी नगरपरिषदेने 100 देशी वृक्षांची लागवड करून माझी वसुंधरा 4.0 अभियानाची उत्तम सुरुवात केली आहे.
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे यांच्या उपस्थितीत शाळा क्रमांक 1 च्या परिसरात वड, पिंपळ, करंज, बकुळ, बदाम अश्या 100 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड मोहिमेचे वैशिष्टय म्हणजे संपूर्ण वृक्ष हे 8 ते 10 फूट इतक्या उंचीची व देशी प्रजातीची आहेत तसेच यांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील शालेय मुलांवर सोपविली आहे.वाढत्या शहरीकरणाच्या युगात शालेय मुलांना वृक्ष लागवड व पर्यायाने पर्यावरण संवर्धना चे महत्व लक्षात यावे तसेच शाळेच्या परिसराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी शहरातील शाळा परिसरात वृक्ष लागवड करण्यास प्राधान्य दिल्याचे मुख्याधिकारी केंद्रे यांनी सांगितले.
ही वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता शीतल जाधव, शहर समन्वयक किरण आराडे,प्रज्ञा सोनवणे,पाटोळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.