शेतकऱ्यांनो सावध व्हा.? व शेतमालाची काळजी घ्या..! बुधवारपासून ४ दिवस अवकाळीचे संकट, बीडमध्ये हि पावसाची शक्यता पंजाबराव डक

शेतकऱ्यांनो सावध व्हा.? व शेतमालाची काळजी घ्या..! बुधवारपासून ४ दिवस अवकाळीचे संकट, बीडमध्ये हि पावसाची शक्यता पंजाबराव डक
राज्यात वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे आधीच शेतकरी संकटात आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या साेमवारपासून पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही शेतमालाची काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
एकीकडे राज्यात उन्हाचा पारा वाढत आहे तर दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पावसाचे सावट आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या मध्यप्रदेशमध्ये चक्राकार वाऱ्यामुळे हे परिणाम समोर येत आहे.
येत्या बुधवार पासून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १५ व १९ मार्चला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
विशेष खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील १५ ते १९ मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये बीड अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, परभणी छत्रपती संभाजीनगर भागात पावसाची शक्यता आहे. तर १५ ते १६ मार्च दरम्यान नागपूर, सातारा, लातूर, गोंदिया, सांगली, लातूर, धाराशिव, हिंगोली, बुलडाण्यात पावसाची चिन्ह आहे. तसेच वाऱ्याचा वेगही ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील काही दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर रब्बी पिकांवर पुन्हा संकट कायम आहे. अशातच, हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर भारतात हिमालय पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. जिथे पोषक वातावरण तिथेच अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता असल्यानं हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.