देश-विदेश

येणारा काळ भारत मातेच्या उत्कर्षाचा व भरभराटीचा -आचार्य महंत गोविंददेवगीरीजी महाराज

येणारा काळ भारत मातेच्या उत्कर्षाचा व भरभराटीचा -आचार्य महंत गोविंददेवगीरीजी महाराज

 

 

जगातील सर्व देश हे भारताकडे कुतुहलाने व उत्सुकतेने पहात असुन येणारा काळ हा भारत मातेच्या उत्कर्षाचा भरभराटीचा व वैभव संपन्नतेचा असणार आहे जागतीक पातळीवर आपल्या देशाला विशेष महत्व प्राप्त होणार असल्याचा विश्वास राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेवगीरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी व्यक्त केला बेलापुर येथील जुने बालाजी मंदीर येथे आयोजित अन्नकुट उत्सवात भावीकांना उपदेश करताना महंत गोविंद देवगीरीजी महाराज पुढे म्हणाले की या देशात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोवींदाने राहतात या देशात वेगवेगळे उत्सव सण उपासणा केल्या जात असल्यामुळे देशाची शोभा दिवसेंदिवस वाढत आहे जगातील एकमेव भारत देश असा देश आहे की तेथे विविध भाषा वेगवेगळ्या परंपरा रितीरीवाज चालीरीती असुनही या देशात ऐकोपा आहे सुख समृद्धी आहे याचे कारण आपल्या सर्वांची एकच भावना आहे की आपण सारे भारत मातेची लेकुरे आहोत आपल्या देशाची एक व्यक्ती इंग्लंडचा पंतप्रधान होवु शकते ही अभिमानाची गोष्ट आहे बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आपली खरेदी गावातच करा ही सुंदर संकल्पना गावकऱ्यांनी राबविली आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा देशाचा विकास करावयाचा असेल तर आपल्या वस्तु गावातच खरेदी करा देशी वस्तुंचाच वापर करा आपली मुले शहराकडे आकर्षित होत आहे नोकरीच्या मागे पळताना गाव गावातील माणसांना विसरत चालले आहे हे कुठेतरी थांबले पाहीजे त्याकरीता उच्च शिक्षणाची सुविधा गावातच मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत जगातील सर्व मुस्लीम राष्ट्रांची परिषद इंडोनेशियात होत आहे काळानुरुप मुस्लिम बांधव देखील बदलण्याच्या विचारात आहेत.असे सागुंन ते पुढे म्हणाले की आपल्या देशाच्या वतीने नेतृत्व करण्याची, विचार मांडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली असुन भगवान केशव गोंविंद महाराज व आपल्या ग्रामस्थांच्या कृपेने नक्कीच यश येईल असेही आचार्य महंत गोविंददेवागीरीजी महाराज म्हणाले ओमप्रकाश व्यास व व्यास परिवारातील बालगोपालांनी देवाचा अतिशय सुंदर पध्दतीने शृंगार केला होता या वेळी अन्नकुटचे यजमान सौ स्नेहलशरद नवले व शरद मोहनराव नवले यांचा सप्त्नीक सत्कार करण्यात आला या वेळी सखाहारी मुळे लिखीत गोमाता कथा अमृत तसेच मोहनराव खानवेलकर लिखीत भगवान श्री हरिहर केशव गोविंद महात्म्य या ग्रंथाचे प्रकाशन तसेच बेलापुर पाणी पुरवठा योजनेस शासनाकडून १२६ कोटी रुपये मंजुर झाल्याबद्दल त्या माहीती पत्रकाचे अनावरण स्वामीजींच्या हस्ते अनावरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोपाल उपाध्याय यांनी केले तर ट्रस्टचे सचिव पंडीत महेश व्यास यांनी आभार मानले

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे