*विजयादशमीच्या मुहूर्तावर जय भवानीचा बॉयलर पेटणार*

*विजयादशमीच्या मुहूर्तावर जय भवानीचा बॉयलर पेटणार*
*उपस्थित राहण्याचे कारखान्याच्या वतीने केले आवाहन*
*ह.भ.प. महादेव महाराज यांच्या शुभहस्ते होणार बॉयलर प्रदिपन*
*संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव (दादा) पंडित, चेअरमन अमरसिंह पंडित यांची राहणार प्रमुख उपस्थिती*
गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर श्रीक्षेत्र चाकरवाङी संस्थानचे मठाधिपती ह. भ. प. महादेव महाराज यांच्या शुभहस्ते बुधवार दि. ५ ऑक्टो रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित व संचालक उपस्थित राहणार असून सभासद, शेतकरी, ऊस तोडणी मजूर, कामगार आदींनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आला आहे.
जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगाम कारखान्याने यशस्वी करून यंदा ४० व्या गाळप हंगामाची पूर्ण तयारी केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मालाचा योग्य मोबदला मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी,. वाहतूक ठेकेदार, ऊस पुरवठादार, कामगार व कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. या गाळप हंगामातील देखभाल दुरुस्तीचे कामे अंतिम टप्प्यात असून कारखाना वेळेत सुरू करण्यासाठी कारखाना संचालक मंडळ व कारखाना प्रशासन जिकारीचे प्रयत्न करीत आहेत. नवीन अत्याधुनिक मशनरी बसविण्याचे कामे रात्रंदिवस कारखान्यात सुरू आहेत. दि ५ ऑक्टोबर रोजी कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित व कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ४० व्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ होणार आहे. तरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.