महाराष्ट्र
टाकळीभान येथे सुरू असलेले शासनाचे जागेवरील अनाधिकृत बांधकाम बंद करून कारवाई करावी— निवेदनाद्वारे मागणी.

टाकळीभान येथे सुरू असलेले शासनाचे जागेवरील अनाधिकृत बांधकाम बंद करून कारवाई करावी— निवेदनाद्वारे मागणी.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील गट नं. २४५ मधील शासनाच्या जागेवर अनाधिकृतपणे खोदाई व बांधकाम सुरू असून हे बांधकाम तात्काळ बंद करून कारवाई करावी अशी मागणी अप्पासाहेब नानासाहेब रणनवरे
यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर व तहसिलदार श्रीरामपूर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, मौजे टाकळीभान ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर येथील गट नं. २४५ मध्ये शासनाच्या जागेवर आनाधीकृतपने खोदाई व बांधकाम सुरु आहे ते तत्काळ बंद करून शासनाची जागा शासनाने वाचवावी.व अनिधिकृतपणे
बांधकाम करणार्यांवर कारवाई करावी.
येथील काही लोक शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम व खोदाई करत आहेत. ते तत्काळ बंद करून कारवाही करावी अन्यथा १ मार्च रोजी मी व माझे कुटुब अन्नत्याग (उपोषण ), आत्मदहन करणार आहे. आमच्या जिवितास काही धोका झाल्यास ते अतिक्रमण करणारे लोक यार जबाबदार असतील असे निवेदनात
नमुद करण्यात आले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, ४) पोलीस अधीक्षक, तहसीलदार,
आयुक्त नाशीक, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी
यांना देण्यात आल्या आहेत