राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांच्यावर राहुरी पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल !

राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांच्यावर राहुरी पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल !
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सजन्नकुमार नाऱ्हेडा यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असुन दवणगाव परिसरातील पिडीत महिलेनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सदर पीडित महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हंटले की,देवळाली प्रवरा येथील व्यक्तीने विरुद्ध जमीन खरेदीत माझी फसवणूक केलेबाबत तक्रारी अर्ज देण्यासाठी देवळाली प्रवरा पोलीस दूरक्षेत्र येथे गेले होते. तेव्हा तेथे मला एक अनोळखी इसम भेटला त्यास मी तक्रारी अर्जाबाबत सांगितले तेव्हा त्याने मला एक मोबाईल नंबर दिला व म्हणाला की, हे राहूरी पोलीस स्टेशनचे साहेब आहेत त्यांना तुम्ही फोन करा ते तुमची तक्रार घेतील असे सांगितल्याने मी माझ्या मोबाईल वरून फोन लावुन राहुरी पोलीस स्टेशनला फोन लागला आहे का असे विचारले तेव्हा त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फोन लागलेला आहे असे सांगितले.
त्यानंतर मी त्यांना माझे तक्रारी अर्जाबाबत त्यांना सांगितले असता त्यांनी मला संगितले की, दोन दिवसानंतर माझे ऑफिस मध्ये या मी दोन दिवसानंतर पोलीस स्टेशनला येणार आहे असे सांगितले. त्यानंतर दि. ७ जून रोजी मी राहुरी पोलीस स्टेशनला आले तेव्हा मला समजले की, राहुरी पोलीस स्टेशनचे साहेब रिटायर झालेले आहे म्हणून मी नार्हेडा साहेबांचे केबीन मध्ये माझी तक्रार सांगण्यासाठी गेले. त्यांना मी माझे तक्रारी अर्जाची हकिगत सांगितली मला म्हणाले की, तुम्हाला मिस्टर नाहीत का? तुम्ही एकटाच आलेल्या आहेत का? तुमच्या सोबत कोणी नाही आले का,कास्ट कुटली आहे असे प्रश्न मला विचारले. त्यानंतर म्हणाले की, तुमचे काम मी करून दिल्यास यामध्ये माझा काय फायदा आहे असे विचारले तेव्हा मी त्यांना म्हणाले की, मी तुम्हाला पन्नास हजार रुपये देईल ते मला म्हणाले की, पैशा व्यतिरीक्त माझा काय फायदा होईल त्यावेळी मी म्हणाले की, आणखी पैसे पाहिजे असेल तर देईल तेव्हा ते मला म्हणाले की, मला पैसे पाहिजे नाही मला काय पाहिजे आहे ते समजून घ्या तुम्ही, असे म्हणाले असता मी त्यांना म्हणाले की, मला असे काही बोलु नका साहेब तुम्हाला माझी विनंती आहे असे मी त्यांना म्हणाले की, नंतर त्यांनी माझा तक्रारी अर्ज टाईप केला व तो ठाणे अंमलदार यांचेकडे देण्यास लावला मी सदरचा तक्रारी अर्ज आणे अंमलदार यांचेकडे देवून यावर पोहच घेवुन मी माझे घरी निघुन गेले. त्यानंतर आठ दिवसानी नारहेडा साहेब यांना फोन करून माझे तकारी अर्जाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, मला फोन करायचा नाही तुमचे काय काम आहे ते माझे ऑफिस मध्ये येवुन मला सांगायचे असे म्हणाले नंतर मी राहुरी पोलीस स्टेशनला माझे तक्रारी अर्जाबाबत चौकशी करण्यासाठी आले व पोलीस स्टेशन समोर उभी असताना नार्हेडा साहेबानी त्यांचे मोबाईल नंबरच्या व्हाटसअप वरुन मला तु खुप छान दिसते असा मेसेज केला होता.
त्यानंतर मी पोलीस स्टेशनच्या साहेबांना भेटुन तक्रारी बाबत सांगुन निघुन गेले. त्यानंतर ते मला व्हाटसअपवर तू माझ्याशी मैत्री करशील का असे मेसेज करू लागले. त्यांनी केलेल्या मेसजला मी रिप्लाय न दिल्याने ते मला प्लिज जानु रिप्लाये दे असा मेसेज केला. त्यानंतर माझे व्हाटसअपवर मोबाईलवर व्हाइस कॉल करून तुला मला भेटायचे आहे असे म्हणू लागले तेव्हा मी त्यांना हे शक्य नाही असे म्हणाले. त्यानंतर दि. ८/७/२०२३ रोजी नारहेडा साहेबांचे विरुध्द एसपी साहेबांकडे तक्रारी अर्ज केला होता. त्यानंतर देखील त्यांनी मला व्हाईस कॉल करून तु माझ्या विरुध्द तक्रारी अर्ज का केला आहे असे म्हणून तुझ्या विरुध्द मी गुन्हा दाखल करील अशी धमकी देवू लागले. तसेच व्हाइस कॉल करुन तु जर माझ्याकडे आली नाही तर मी तुझ्या घरी येवुन तुझ्या मुलासमोर मी काहीपण कृत्य करीन अशी धमकी देवु लागले.
त्यानंतर दि. १७/७/२०२३ रोजी दुपारी ३:३० वा. सुमारास मी कामानिमीत्त तहसिल कार्यालय राहुरी येथे आले व झेरॉक्स काढण्यासाठी तहसिलच्या बाहेर चिंचेच्या झाडाखाली उभी असताना मला तेथे नारहेडा साहेब म्हणाले की, तुला आता माझ्या सोबत रुमवर यावे लागेल तेव्हा मी त्यांना नकार दिल्यावर ते मला म्हणाले की, रात्री मी तुझ्या घरी येवुन तुझ्या मुलासमोर काहीपण करील अशी धमकी दिली म्हणुन मी दुपारी ४:०० वा. सुमारास माझे स्कुटी गाडीवर त्यांचे राहुरी स्टेशन रोडला असलेल्या रूमवर गेले तेथे त्यांनी माझ्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध केलेले आहे.
सदर महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे पोलीस दलासह नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून रक्षकच जेव्हा भक्षक बनतात यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वासाहर्ता कमी होत चालली असे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे या घटनेचा तपास राहुरीत नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक धनंजय जाधव कसा करणार याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे