*आई संस्था बालग्राम परीवार आयोजित ‘भान तरूणाईचे’ शिबीर*

*आई संस्था बालग्राम परीवार आयोजित ‘भान तरूणाईचे’ शिबीर*
दि.२१ डिसेंबर ते २५ डिसेंबर असे पाच दिवस हे शिबीर असून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी शिबिरात सहभागी होण्यासाठी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन सहारा अनाथालय बालग्राम गोविंदवाडी तालुका गेवराई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
गेवराई शहरापासून तिन कि.मी.अंतरावर गोविंदवाडी परीसरात गेल्या १८ वर्षांपासून अनाथ मुला,मुलीसाठी संतोष गर्जे,प्रिती गर्जे यांनी सहारा अनाथालय ( बालग्राम) उभे केले असून याठिकाणी जवळपास दिडशे मुल,मुली निवासी आहेत. या बालग्राम च्या वतीने वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात.दरम्यान गेल्या सात वर्षांपासून डिसेंबर महिन्यात याठिकाणी आई संस्था बालग्राम परीवाराच्या वतीने भान तरुणाईचे ( चला देऊ आकार स्वप्ऩांना, समृद्ध आणि अर्थपूर्ण जीवणासाठी ) शिबीर आयोजित करण्यात येत आहे. हे आठवे वर्षे असून आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचे चर्चा सत्र, मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात येत आहे. यावेळी दि.२१ डिसेंबर ते २५ डिसेंबर असे पाच दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी अतुल देऊळगावकर पर्यावरण तज्ञ ( लातुर), प्रमोद वैद्य ( उद्योजक पुणे), दिपक नागरगोजे ( शांतीवन प्रकल्प आर्वी जिल्हा बीड), प्रा. दासु वैद्य ( लेखक, कवी, गीतकार औरंगाबाद), महेश म्हात्रे ( पत्रकार मुंबई), श्नीमती विणाताई गोखले ( देणे समाजाचे कल्पनेच्या शिल्पकार), मतीन भोसले ( फासेपारधी मुलांचा मसिहा), हेरंब कुलकर्णी ( शिक्षण तज्ञ पुणे) हे सन्मानीय अतिथीचे या शिबिरात मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या शिबिरात सहभागी होण्यासाठी सहारा अनाथालय बालग्राम परीवार गोविंदवाडी गेवराई यांच्याशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी असे बालग्रामचे संचालक संतोष गर्जे, प्रिती गर्जे सह परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.