धार्मिक

अखंड हरिनाम सप्ताह हा प्रतिष्ठेचा नसून परिवर्तनाचा असतो महंत प्रकाशनंदगिरीजी महाराज  

अखंड हरिनाम सप्ताह हा प्रतिष्ठेचा नसून परिवर्तनाचा असतो महंत प्रकाशनंदगिरीजी महाराज  

 

 

राहुरी तालुक्याचा पूर्व भागातील वांजूळपोई येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सदिच्छा भेट देण्यासाठी श्रीक्षेत्र देवगड संस्थान चे उत्तराधिकारी महंत गुरुवर्य प्रकाश नंदगिरी   महाराज यांनी बोलताना सांगितले की आजच्या तरुण पिढीला शिक्षणाबरोबर संस्काराची गरज असून त्यासाठी गावोगावी ज्ञानेश्वरी पारायण अर्थात अखंड हरिनाम सप्ताह ची काळाची गरज बनली आहे.

त्यामुळे वयोवृद्धां बरोबर तरुण पिढी परमार्थ कडे वळल्या शिवाय राहणार नाही. त्यासाठी गावात राजकारण सोडून समाजकारण केल्यास गावाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. तसेच मुलांनी आई-वडिलांची सेवा केल्यास त्यांना भगवंताची प्राप्ती होईल यात शंका नाही.  गावात एकोपा असल्यास गावाचा विकासाला कोणी रोखू शकणार नाही.

गुरुवर्य स्वामीजी यांची देवगड संस्थान येथे उत्तराधिकारी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते वांजुळपुई येथे आले असता बोलले यावेळी महाराजांची रथात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यां कलशधारी महिला सह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भजनी मंडळासह ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे