टाकळीभान येथे विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न. ससाने गटाने फिरवली पाठ.

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे आमदार लहु कानडे यांच्या प्रयत्नाने विविध विकास कामांचा शुभारंभ आ. कानडे यांच्या हस्ते तर पंचायत समितीच्या सभापती डाॕ. वंदनाताई मुरकुटे यांच्या आध्यक्षतेखाली काल मंगळवारी संपन्न झाला. कार्यक्रम पञिकेत नामोल्लेख आसतानाही काँग्रेसच्याच ससाने गटाने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने हा चर्चेचा विषय ठरला आसुन श्रीरामपुर तालुक्यात काँग्रेसमध्ये अलबेला नसल्याचे ग्रामस्थांना दर्शन झाले.
आ.लहु कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून टाकळीभान येथील १ कोटी २६ लाख रूपये कामांचा शुभारंभ मंगळवार दि. २२ फेब्रूवारी रोजी पार पडला. यामध्ये टाकळीभान ते जुना कमालपूर रस्ता ८० लाख रूपये, राजवाडा परिसरातील मागासवर्गीय स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीसाठी रक्कम २० लाख रूपये, टाकळीभान ते बेलपिंपळगाव रस्त्यासाठी २० लाख रूपये तसेच भवार – फुगे नवीन रोहीञ बसवणे साठी ६ लाख खर्चाच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. या सर्व कामांचे उद्घाटन आ.कानडे यांचे हस्ते तर सभापती डाॕ. वंदनाताई मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली व काॅग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी ग्रामस्थांनी रस्त्यांच्या मंजुर निधीपेक्षा अधिक निधी मिळुन संपुर्ण रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी आ. कानडे यांनी पुढील काळात संपुर्ण रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिल्याने उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात आ. कानडे यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
जिल्हा काॅग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, प्रा. कार्लस साठे, जिल्हा काॅग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, पं.स. सदस्य अरुणपाटील नाईक, अशोक कानडे, विष्णुपंत खंडागळे, अॕड. सर्जेराव कापसे, अॕड. विलास थोरात, तालुका काॅग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, तालुका सरचिटणीस महेंद्र संत, जिल्हा काॅग्रेस चिटणीस विष्णूपंत खंडागळे, अॕड. समीन बागवान, अॕड.प्रमोद वलटे, बंडू कोकणे, बंडू बोडखे, शंकर शिंदे, शिवाजी धुमाळ, प्रहारचे तालुकाध्यक्ष रघूनाथ शिंदे, संजय रणनवरे, बाबासाहेब तनपूरे, गजानन कोकणे, विष्णूपंत पटारे, विठ्ठल बोडखे, बापूसाहेब शिंदे, ग्रा.वि.अधिकारी आर.एफ. जाधव, भाऊसाहेब पटारे, आबासाहेब रणनवरे, आनिल कोकणे, विनोद रणनवरे, सतिष रणनवरे, संविधान ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनाच्या कार्यक्रम पञिकेत काँग्रेसचे करण ससाने, सचिन गुजर व तालुक्यातील महत्वाच्या कार्यकर्त्यांचा नामोल्लेख करण्यात आला होता. माञ ससाने गटाच्या या प्रमुख कार्यकर्त्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने काँग्रेसच्या आ. कानडे व ससाने गटात आलबेल नसल्याची चर्चा सुरु होती तर टाकळीभानचे काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष माजी सरपंच भारत भवार यांनाही कार्यक्रमाचे साधे निमंञणही नसल्याने आ. कानडे गटाच्या ढीसाळ नियोजना बद्दल त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या