समाज सुधारण्यासाठी भगवान बाबा प्रयत्न केले- मठाधिपती डॉ नामदेव महाराज शास्त्री

समाज सुधारण्यासाठी भगवान बाबा प्रयत्न केले- मठाधिपती डॉ नामदेव महाराज शास्त्री
सावरगावात रौप्य महोत्सवी संपन्न
गेवराई तालुक्यातील सावरगाव येथे महाशिवरात्री रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने श्री क्षेत्र भगवान गडाचे मठाधिपती महंत डॉ नामदेव महाराज शास्त्री यांचे दि.17 फेब्रुवारी रोजी किर्तन संपन्न झाले. यावेळी बोलताना मठाधिपती महंत डॉ नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले की, अज्ञान असणारा समाज सुधारण्यासाठी आणि चांगल्याप्रकारे सुधारित होण्यासाठी भगवान बाबा यांनी कार्य असून समाजाने हुतात्मा, विद्वत्ता बुद्धिमत्ता त्यांची किंमत करावी तरच समाज पुढे जातो.
गेवराई तालूक्यातील सावरगाव येथे महाशिवरात्री रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ही दि.12 ते दि.19 फेब्रुवारी 2023 या दरम्यान 25 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले. या सप्ताहाच्या निमित्ताने पाचव्या दिवसांची किर्तनसेवा
नव्हे सारीता निराळे । लवण मेळविता जळे ॥
तुका म्हणे बळी॥ जीव दिला पायातळी
या चार चरणाचा अभंग संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या गाथा भजनामधून किर्तनासठी निवड करण्यात आलेला होता. यावेळी मठाधिपती महंत डॉ नामदेव महाराज शास्त्री म्हणाले की, चारशे वर्षांपूर्वी गाथा लिहिलेला हा ग्रंथ खुप मोठा वैचारिक ग्रंथ आहे.
आजच्या काळात पैसा भरपूर प्रमाणात आहे. पण गुणवत्ता, चांगले विचार आज कमी होत आहे.
जीवनात गुरू, वकिल, डॉक्टर चांगले मिळणे आवश्यक आहे. पुरुषार्थ अर्थ काम मोक्ष धर्म पैसा कमी लेखू नका. रामायण भागवत महाभारत गरिब नव्हते. श्रीमंतांच्या कथा असतात. गरिबांच्या व्यथा असतात. यासाठी गरिब राहू नका यासाठी प्रयत्नशील ज्ञानी लोक बना. श्रीमंत असाल पैसा अर्थ बलवान हा पुरुषार्थ पाहिजे. लुबाडणूक करु नका, चोरी, भ्रष्ट पैसा जीवनात यशस्वी करु शकत नाही. शिकलेल्या माणसाला खूप विरोध केला जातो.
ज्यांनी ज्यांनी आपल्या ध्येयासाठी संपूर्ण वेळ दिला त्यांचे आज नाव इतिहासात आहे. सौजन्य मनात असेल तर प्रेम निर्माण होते. एमपीएससी परीक्षा करणारा विद्यार्थी मोकार फिरत नाही. राजकीय नेता एक दोन वेळा पडले तरी निवडणूक लढविणारच असे उपहासात्मक राजकीय भाष्य केले. कारण त्यांचे तपश्चर्या त्याग खुप मोठा आहे.
जर भविष्यात आदर्श समाज घडविण्यासाठी चांगल्याप्रकारे आचरणाची, विचारांची खरी गरज आहे. वेळेचे नियोजन करावे यामुळे वेळेचे महत्त्व प्राप्त करा. मित्रसंगत, कर्म मान सन्मान प्रेम मिळते. जग पुढे चालले आहे. प्रगती केली विज्ञान संशोधन संस्था खुप मोठ्या आहे. बुवाबाजी न करता विज्ञान-तंत्रज्ञान अवलंब केला पाहिजे. देव कणाकणात असता तर सख्खा भाऊ वैरी झाला नसता. दृष्टी चांगली नसल्याने गावगाड्याच्या राजकारणामुळे गडाला सुध्दा तोटा होत आहे यामुळे मी दुःखी आहे. पण अज्ञान असणारा समाज सुधारण्यासाठी आणि चांगल्याप्रकारे सुधारित होण्यासाठी भगवान बाबा यांनी कार्य केले.
तसेच भगवान गडाच्या सेवेसाठी सावरगाव एक चांगले गाव आहे. दुसऱ्याची उष्टे आणि चोरी करू नका. अभ्यास अभ्यास असतो. मनापासून केलेल्या अभ्यास खरा असतो. मन स्थिर करून एकाग्रता राहावे. आवड कशी आहे दृष्टीकोनातून दिसते. यासाठी हुतात्मा, विद्वत्ता बुद्धिमत्ता त्यांची किंमत करा. चांगले वागा. शिक्षण घ्या, तरुण पुढे होऊन समाजहिताचे कार्यक्रम घेतले पाहिजे. असे आवाहन मठाधिपती महंत डॉ नामदेव महाराज शास्त्री यांनी केले.
तीन कोटी लोकसंख्या असलेल्या टोकियो शहर जगातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ आहे. पण यासाठी येथील जनतेचे प्रयत्न आहे. कारण जपान देशातील लोकांचे विचार, संस्कृती देशप्रेम खुप मोठे योगदानाबरोबर त्याग आहे. त्यामुळे जपान देश पुढे आहे. आधुनिक तंत्रज्ञान, विकसित सेवा, बुलेट ट्रेन तर आपल्या देशात खड्ड्यात रस्ते आहे. रस्त्यावरुन जाताना म्हशी जनावरे आड येतात. यावरून आपल्या देशाची प्रगत देशांमधील फरक दिसून येतो असे असले तरी भविष्यात समाज परिस्थिती उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे असा मौलिक विचार व्यक्त केला.