टाकळीभानच्या राजकारणात गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर नवी राजकिय गुढी उभारण्याचा संकल्प, विकासासाठी विरोधकांचा एकञ येण्याचा निश्चय.

टाकळीभानच्या राजकारणात गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर नवी राजकिय गुढी उभारण्याचा संकल्प, विकासासाठी विरोधकांचा एकञ येण्याचा निश्चय.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे पं.स.सभापती डाॅ.वंदना मुरकुटे यांच्या विकासनिधीतून मिळालेल्या जलशुध्दीकरण संचाचे उद्घाटनाच्या निमित्ताने एकञ आलेल्या प्रमुख नेत्यांनी विद्यमान घडामोडींवर तिव्र नापसंती व्यक्त करीत विकासाआड येणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर एकञ येवुन नवी सहमतीची गुढी उभारण्याचा संकल्प केल्याने भविष्यातील गावच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी माजी सभापती डाॕ. वंदना मुरकुटे, माजी सभापती नानासाहेब पवार, जिल्हा काँग्रेसचे ज्ञानेश्वर मुरकुटे माजी सरपंच मंजाबापु थोरात, माजी उपसरपंच भारत भावार, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, माजी चेअरमन राहुल पटारे, बाबासाहेब तनपुरे, नारायण काळे प्रमुख उपस्थित होते.
टाकळीभान येथील ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने येथील स्थानिक ग्रामस्थांनी डाॅ.मुरकुटे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार डाॅ.वंदना मुरकुटे यांनी १५ व्या वित्त आयोगातून ३,८५,९१७ रूपये किंमतीचे जलशुध्दीकरण संच (आरो प्लॅन्ट) टाकळीभान गावासाठी दिला. या संचाचे उद्घाटन काल गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर विविध पक्षाच्या व गटाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताने माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले की, डाॅ.वंदना मुरकुटे यांनी टाकळीभान गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला असून त्यांचे हे काम कौतूकास्पद आहे. येथून पुढच्या काळातही वंदना मुरकुटे यांनी असेच चांगले काम संपूर्ण तालुक्यासाठी करावे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त करून खेळीमेळीच्या वातावरणात राजकारण सोडून समाजकारण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सद्य स्थितीत स्थानिक पातळीवर विकास कामाला विरोध करणाऱ्यांचा खरपुस समाचार घेत विकासासाठी संघटीत होण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी उपसरपंच भारत भवार यावेळी म्हणाले की, येथील टाकळीभान, कारेगाव, पिंपळगाव हे दाट लोकवस्तीचे रस्ते होणे गरजेचे असताना लोकवस्ती नसलेल्या रस्त्यासाठी पैसे खर्च होत असल्याने खंत व्यक्त करुन विकासकामात आडवे येणाऱ्यांना धडा शिकवला पाहीजे असे यावेळी सांगून भानुदास मुरकुटे यांनी शेतीच्या पाण्यासाठी आवाज उठविला तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून डाॅ.वंदना मुरकुटे या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवितात हे कौतूकास्पद असल्याचे ते म्हणाले. माजी सरपंच मंजाबापू थोरात म्हणाले की, डाॅ.वंदना मुरकुटे यांच्या विरोधात आम्ही काम केले. तरी त्यांनी या गोष्टीचा राग कधी धरला नाही. मात्र आजकाल राजकारण करताना बरेच लोक खूनशी राजकारण करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त करून भविष्यात चांगल्या कामासाठी गटतट विसरून एकत्र येवू मात्र जो घुसखोरी करत असेल सत्तेचा गैरवापर करत असेल त्याच्या विरोधात ठोस भूमीका घेवू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. प्राचार्य जयकर मगर यांनीही विकास करणाऱ्यांच्या पाठीशी तर खुनशी राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात काम करणार आसल्याचे ठणकावुन सांगितले. भाजपाचे नारायण काळे यांनीही स्थानिक सत्ताधारी गटावर तोफ डागली. प्रा, विजय बोर्डे यांनीही यावेळी एकञ येण्याची गरज व्यक्त केली.
एकुणच सुमारे वर्षभराच्या कालावधीनंतर आर. ओ. च्या उद्घाटनाच्या निमित्ताने हे स्थानिक नेते एकञ आल्याने विद्यमान राजकारणाचा घसरलेला दर्जा व जिरवाजिरवीचे होत आसलेले राजकारण यावरच सर्व प्रमुख नेत्यांनी आसुड ओढत विकासासाठी एकञ येण्याचा संकल्प गुढी पाडव्याची गुढी उभारुन केल्याचे दिसुन आल्याने ही भविष्यातील राजकारणाच्या परीवर्तनाची नांदी ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
यावेळी काॅग्रेस तालुका सरचिटणीस महेंद्र संत, मोहन रणनवरे, , सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष मधूमामा कोकणे, आबासाहेब रणनवरे, अशोक तर्हाळ, विजू गटकळ, दादासाहेब कापसे, शरद कापसे, सुदाम पटारे, बापूसाहेब शिंदे, सोमनाथ पाबळे, गजानन कोकणे, बंडू कोकणे, बंडू बोडखे, भैय्या पठाण, बाबासाहेब बनकर, काका रणनवरे, प्रकाश दाभाडे, राजेंद्र देवळालकर, विष्णूपंत पटारे, मधूकर गायकवाड, आदी उपस्थित होते.
टाकळीभान मधील राजकीय पुढाऱ्यांची स्थिती म्हणजे ,कोणत्या गाईचे वासरू कोणत्या गायला पित अशी झाली आहे , -ग्रामस्थांमध्ये चर्चा
यावेळी बोलताना ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले की, आरो प्लॅन्ट देताने अनेक अडचणी आल्या. मात्र या कामासाठी येथील सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली त्यामुळेच हे काम पुर्णत्वास गेले. येत्या वर्षभरात येथील बेलपिंपळगाव, कारेगाव, गणेशखिंड रस्ता व इतर विकास कामे आमदारांच्या माध्यमातून पुर्ण करू. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.