शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त मान .शेखर गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आले*

*शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त मान .शेखर गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आले*
मा. उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय होईपर्यंत शासनाने स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी प्रति मे. टन १०/- रुपयाप्रमाणे रक्कम कपातीची सक्ती करु नये
व गाळप परवाने रोखून धरून गाळप हंगाम विस्कळीत करण्याचे आडमुठे धोरण स्वीकारू नये, यासह हंगाम २०१८-१९ पासून प्रलंबित असलेले महसुली विभागणी सूत्रानुसार (आर.एस.एफ) प्रमाणे अंतिम ऊस दर तातडीने अदा करावेत, साखर विक्रीवरील रिलीज मेकॅनिझम (ठरवून दिलेला कोटा पद्धती) हटवण्यात येऊन कच्ची व पांढरी साखरेवरील निर्यातीचे निर्बंध हटवावे, प्रसाद शुगर कारखान्याकडील सन २०१८-१९ हंगामाची श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रति टन २२१/- रू.प्रमाणे फरकाची ऊस बिले आदेशानंतरही कारखान्याने जाणीवपूर्वक अडकवून ठेवल्याबाबत गंभीर दखल घेऊन प्रसाद शुगर कारखान्याविरुद्ध सक्तीची वसुली कारवाई (आर.आर.सी) दाखल करून शेतकऱ्यांची फरकाची थकीत ऊस बिले १५% व्याजासह तातडीने मिळावीत, तोडणी यंत्राने ऊस तोडणी केलेल्या उसाच्या वजनातून ४.५% घट धरण्याच्या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा या विविध मागण्यांबाबत शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासोबत चर्चा करून या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सादर करण्यात आले. साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड हे अशोक कारखान्याच्या गाळपाचा शुभारंभ कार्यक्रमानिमित्त आले असता शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने कारखाना कार्यस्थळावर त्यांची भेट घेतली. याप्रसंगी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे, साखर आयुक्त कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाचे संचालक मंगेश टिटकारे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, संचालक व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे नेते व महाराष्ट्र राज्य उस नियंत्रण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पटारे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रतापराव पटारे, जिल्हा संघटक भास्करराव तूवर, युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष संदीप उघडे, अशोक कारखान्याचे माजी संचालक मारुतराव पटारे, कानिफनाथ चव्हाण, नामदेवराव गायके, गणेश जोशी व शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.