आकाशवाणीचे स्थानिक प्रसारण पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी केंद्रनिदेशक,व उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

आकाशवाणीचे स्थानिक प्रसारण पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी केंद्रनिदेशक,व उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
टाकळीभान प्रतिनीधी – – अहमदनगर येथील आकाशवाणी केंद्राचे स्थानिक कार्यक्रम पूर्ववत सुरू ठेवण्याबाबतची मागणी निवेदनाव्दारे मा.केंद्रिय सूचना व प्रसारण मंत्री यांना आकाशवाणी अहमदनगरचे केंद्र निदेशक बाबासाहेब खराडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांचे मार्फत आकाशवाणीचे श्रोतेमिञ, लेखक, कवी,सामाजिक कार्यकर्ते, कलावंत व नैमित्तिक उद्घोषक व हंगामी कर्मचारी यांनी गुरुवार दि. २५ ऑगस्ट रोजी लेखी निवेदनाव्दारे केली आहे
या निवेदनात म्हटले आहे की आकाशवाणीचे स्थानिक कार्यक्रम पूर्ववत सुरू ठेवावे कारण त्यामुळे स्थानीक कलाकार, साहित्यिक, तज्ज्ञ, शेतकरी, श्रोतेमिञ यांना वाव मिळतो आणि त्यामुळे ज्ञानवर्धक माहिती मिळते, संस्कृतीचा विकास व संवर्धन होते असे म्हटले आहे. स्थानिक संस्कृतीची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती मिळते.व संध्याकाळचे स्थानिक प्रसारण बंद करून मुंबई व दिल्ली केंद्रावरून जे सहक्षेपण सुरू आहे त्यामुळे श्रोत्यांमध्ये नाराजी वाढत आहे असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर न्यू आर्ट्स कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.खासेराव शितोळे, शिक्षक नेते श्री.प्रशांत म्हस्के, नाट्य दिग्दर्शक श्याम शिंदे, नाट्य कलावंत संजय लोळगे, शिक्षक नेते प्रशांत म्हस्के,
जेष्ठ हंगामी निवेदक व ऑल इंडिया रेडिओ कॅज्युअल अंनौन्सर अँड कॅम्पेरर या राष्ट्रीय युनियनच्या अहमदनगर शाखेचे जिल्हा अध्यक्ष आदिनाथ अन्नदाते, निवेदक संजय वैरागर, शशिकांत जाधव, अतुल सातपुते, सोमनाथ कांडके, वर्षा बांगर, रेखा शेटे, गौरी जोशी, अंजली बडवे, वंदना साबळे, शीतल शिंदे, भारती कुलकर्णी, प्रज्ञा असनीकर, सोनाली पुंडे, डॉ. प्राची शेकटकर, गजानन गारुळे, विद्या जोशी, ज्ञानेश्वर राऊत, वृषाली घनवट, आकाशवाणीचे श्रोतेमिञ भाऊसाहेब नवथर, किरण वीर, जेष्ठ श्रोते लक्ष्मण जगताप, हरिभाऊ बिडवे, अशोक पाटील यांच्या सह्या आहेत