महाराष्ट्र

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांसह मजुरांचा जीवघेणा प्रवास*

*बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांसह मजुरांचा जीवघेणा प्रवास*

 

बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर यामुळं शेती पिकांचे देखील मोठं नुकसान झालं. बीड जिल्ह्याला या मुसळधार पावासाचा मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळं पुराच्या पाण्यातून वाट काढताना शेतकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. बीड तालुक्यातील केसापूर येथील एका ओढ्याला पूर आल्यानं शेतकऱ्यांना आणि मजुरांना पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.

 

बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराचं पाणी शेतात घुसल्यानं उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बीड तालुक्यातील केसापूर परभणी येथील एका ओढ्याला पूर आल्यान शेतात गेलेल्या मजुरांना आणि शेतकऱ्यांना या पुराच्या पाण्यातून रस्सीच्या सहाय्याने ओढा पार करावा लागला. विशेष म्हणजे महिलांनी आपला जीव धोक्यात घालून या पुराच्या पाण्यातून आपली वाट मोकळी केली. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी बैलगाडी घेऊन पुराच्या पाण्यातून ओढा पार केला आहे.

 

बीड जिल्ह्यात शेती पिकांचं मोठं नुकसान

 

दरम्यान, मुसळधार पावसामुळं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पुराच्या पाण्यामुळं सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांना मोठा फटका बसला आहे. तर अनेक ठिकाणी शेतजमीनी खरडून गेल्या आहेत.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे