तब्बल ५२ वर्षानंतर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने टोकाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे.

तब्बल ५२ वर्षानंतर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने टोकाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे.
तालुक्यातील बहुचर्चित पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत बिनविरोध करत मा. आ. राहुल जगताप व दिनकर पंधरकर यांनी सहमती एक्स्प्रेस राबवली. तब्बल ५२ वर्षानंतर पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने टोकाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे.
पाठीमागच्या काळामध्ये ग्रामपंचायत बिनविरोध करा व लाखोचे बक्षीस कमवा अशी आश्वासने पाहू नेतेमंडळीनी दिली मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचायत बिनविरोध करुन मा.आ. राहुल जगताप यांनी आपल्या राजकीय धुरंधरपणाची चुणूक दाखवली.
पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत बिनविरोध करताना भास्करराव कदम व विश्वनाथनाना खरात यांनी मध्यस्थी करत महत्वपुर्ण जबाबदारी बजावण्याचे काम केले.
चौकट
गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात जेणेकरुन शासनाचा खर्च वाचेल. निवडणूक काळात एकमकेकाविरोधात निर्माण होणारी कटुता थांबेल. आणि गाव विकासाच्या मार्गावर जाईल या प्रयत्नातून आपण ही संकल्पना राबवत आहोत.
मा.आ.राहुल जगताप पाटील
** बिनविरोध निवडून उमेदवार
इथापे लक्ष्मण बापु, पंदरकर वंदना संतोष, कदम बापु नरसिंग, शिंदे चांदन नितीन, पंदरकर सिमा संतोष, पवार दत्तात्रय शंकर, जगताप प्रियंका मयुर, पाडळे अनिल रामकिसन, जगताप प्रतापराव नारायण, नागवडे अमृता सचिन, भोसले सरोजनी संतोष, पंदरकर सुपाली सुभाष, पवार सुर्यजीत निवृत्ती, पंदरकर किशोर आण्णासाहेब, शेंडगे राहुल बापुराव, सकट अजंना रमेश, खरात अलका विजय यांचा समावेश आहे.
बिनविरोध नवनिर्वाचीत सदस्याचे मा.आ. राहुलदादा जगताप पा. व मा. जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव पंदकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.