श्रीगोंदा शहराच्या विविध विकास कामांसाठी ६ कोटी १६ लाखांचा निधी मंजूर : आ. बबनराव पाचपुते

श्रीगोंदा शहराच्या विविध विकास कामांसाठी ६ कोटी १६ लाखांचा निधी मंजूर : आ. बबनराव पाचपुते
— मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांचे विषेश सहकार्याने सर्व कामे मंजूर —
श्रीगोंदा प्रतिनिधी : – श्रीगोंदा शहरातील विविध विकास कामांसाठी ६ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे आपण या निधीची मागणी केली होती. त्यांच्या आदेशाने हा निधी नगरविकास खात्याने ५ कोटी तर जिल्हास्तरीय नगरोत्थान मधुन १ कोटी १६ लक्ष निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार आ पाचपुते यांनी म्हटले आहे, ” श्रीगोंदा शहर विकासाचे नियोजन आपण केले होते. २०१९ च्या न. पा. निवडणूकी नंतर या विकास कामांच्या नियोजनाला काही प्रमाणात खीळ बसली होती. नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरवासीयांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिले आहे. ही जबाबदारी लक्षात घेता आपण मागील तीन वर्षात शहरात वेगवेगळ्या विकास कामांसाठी निधी आणायचे काम केले आहे. परंतु सरकार विरोधात असल्याने त्यामध्ये थोड्या अडचणी येत होत्या, आता आमचे सरकार आल्यामुळे मागील तीन वर्षांचा विकास कामांचा अनुशेष आता भरून काढणार आहे.”
आमदार पाचपुते यांनी गटनेत्या छायाताई गोरे, उपनगराध्यक्ष संग्राम घोडके व इतर नगरसेवकांची या बाबत बैठक घेऊन, शहरातील प्रश्न व अडचणी समजून घेतल्या. त्यानुसार सविस्तर कामांची यादी मुख्यमंत्र्यांना देऊन ५ कोटी रुपयांची मागणी केली. त्यामध्ये शहरातील अनेक रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, काँक्रीटकरण व पेव्हर ब्लॉक बसणे आदी कामे आहेत. मुख्यमंत्री यांनी तातडीने आदेश देत नगरविकास खात्याने हा निधी मंजूर केला आहे. ही कामे तातडीने सुरू करण्यात येणार आहे. शिवाय आणखी भरीव निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शिवाय जिल्हा नियोजन समिती कडे मागे आपण शहराच्या निधीसाठी मागणी केली होती. त्यावर निर्णय घेत १ कोटी १६ लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. ते ही काम लवकर सुरू करण्यात येत असल्याचे पाचपुते यांनी म्हटले आहे.
चौकट :-
शहर विकासासाठी बबनराव पाचपुतेच..
श्रीगोंदा नगरपालिकेसाठी सर्वाधिक निधी आमदार बबनराव पाचपुते यांनीच आणला. बाह्यवळण रस्ता, नळयोजना, १७ रस्ते, नाना नाणी पार्क आदी महत्वाच्या कामांना कोट्यवधींचा निधी आला. २०१४ ते २०१९ मध्ये भाजप सरकार असताना पाचपुते यांचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी कधी डाववला नाही. २०१९ नंतर भाजप सरकार गेले. २०२२ ला पून्हा सरकार आले आहे. श्रीगोंदा शहर हे पाचपुते यांचे आजोळ आहे, शहराला त्यांनी कमी पडू दिले नाही. राज्य सरकारचा फायदा शहराच्या विकासाला पुन्हा ते करून देतील असा विश्वास आम्हा सर्वांना आहे. – छायाताई गोरे (भाजपा गटनेत्या श्रीगोंदा नगरपरिषद)