गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीला पळून नेऊन अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीला पळून नेऊन अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

 

_श्रीगोंदा सत्र न्यायालयाचा निकाल; कर्जत पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक करून केले होते दोषारोपपत्र दाखल_

 

कर्जत प्रतिनिधी – 

तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस पळून नेल्याप्रकरणी तीन आरोपींना श्रीगोंदा सत्र न्यायालयातील न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी सक्तमजुरीसह, कैदेची शिक्षा सुनावली आहे. यातील आरोपी फिरोज चाँद मुलाणी, ओंकार शिवाजी कुलथे, अतुल बाळू आढाव सर्व राहणार दुरगाव (ता.कर्जत) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. श्रीगोंदा न्यायालयाचे न्यायाधीश मुजीब शेख यांनी ही शिक्षा सुनावली आहे. दि.१ जुन २०२१ रोजी हा गुन्हा घडला होता.

        कर्जत तालुल्यातील दूरगाव येथील अल्पवयीन पीडितेला फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पळून नेऊन तिला बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे भाड्याच्या खोलीत ठेऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीला मुलगी पळून नेण्यासाठी एक टेंपोगाडी उपलब्ध करून पळून नेण्यासाठी इतर दोघांनी मदत केली होती. याबाबत महिला फिर्यादी यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली होती.फिर्यादीवरून मुख्य आरोपीवर भा.द.वी कलम ३७६ (२),(जे),(आय) ३६३,पोस्को ३,४,१६,१४ असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी फिरोज मुलाणी यावर ३७६ (२) (एन) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी,५ हजार दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद. तसेच भा.द.वी कलम ३६३अन्वये ३ वर्षे शिक्षा व हजार रुपये दंड,दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ६ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ४ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. तर त्याला मदत करणारे आरोपी ओंकार शिवाजी कुलथे, अतुल बाळू आढाव यांच्यावर भा.द.वी कलम ३६३ अन्वये ३ वर्षे शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते .या गुन्ह्य़ात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून अॅड. पुष्पा कापसे यांनी काम पाहिले तर त्यांना कर्जतचे प्रशिद्ध वकील अॅड. सुमित पाटील यांनी फिर्यादीचे वतीने मदत केली होती . 

 

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, देविदास पळसे यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. तर कोर्ट भैरवी अधिकारी आशा खामकर, नाना दरेकर यांनी या गुन्ह्य़ात चांगले सहकार्य केले होते. 

      आरोपींच्या शिक्षेसाठी कर्जत पोलिसांनी योग्य तपास केला होता. श्रीगोंदा न्यायालयाने सूनवलेल्या निकालामुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे