पोलिस ॲक्शन मोडमध्ये; विविध वॉरंटमधील आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर
२४ जमानती वॉरंट,१६ अटक वॉरंट तर ३ पोटगी वॉरंटमधे कारवाई

कर्जत पोलिस ॲक्शन मोडमध्ये; विविध वॉरंटमधील आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर
२४ जमानती वॉरंट,१६ अटक वॉरंट तर ३ पोटगी वॉरंटमधे कारवाई
कर्जत प्रतिनिधी – – सध्या कर्जत पोलिसांच्या ॲक्शन मोडची सर्वत्रच चर्चा रंगू लागली आहे त्याला कारणही तसेच आहे. कर्जत पोलिसांनी न्यायालयातील तारखांना वेळोवेळी दांडी मारणाऱ्या तब्बल १६ नागरीकांना मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत अटक करून कर्जत, श्रीगोंदा, नगर तसेच आष्टी न्यायालयात हजर केले आहे. जमानतीचे वॉरंट असलेल्या २४ लोकांनाही अटक करून त्यांना न्यायालयात हजर करुन जामीन घ्यावा लागला आहे. एवढंच नव्हे तर पोटगीची रक्कम न देणाऱ्या तिघांना वॉरंट काढून न्यायालयासमोर उभे करून पिडितांना पोटगीची रक्कम मिळवून दिली आहे. आणि हे घडले आहे ते कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या धाडसी निर्णयामुळे. अशा नागरिकांवर केलेली धरपकड अटक मोहीम कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना एक प्रकारचा धाकच निर्माण केला आहे.
वेगवेगळ्या घटनांमध्ये कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलामांतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल होतात.पोलीस ठाण्याकडून हे गुन्हे न्यायालयाकडे वर्ग होतात.न्यायालयाकडून आरोपींची जामिनावर सुटका होते. मात्र जामीन मिळाल्या नंतर संबंधित आरोपींनी न्यायालयाने दिलेल्या तारखांना हजर राहणे बंधनकारक आहे. मात्र अनेकांकडून न्यायालयीन तारखांना दांडी मारली जाते. आणि तारखांना गैरहजर राहिलेल्या नागरीकांना हजर करण्यासाठी न्यायालयाकडुन पोलीसांकडे वॉरंट दिले जातात.त्यानंतर पोलीस यंत्रणेमार्फत त्या वॉरंटची बजावणी केली जाते.ज्यावेळी हे वॉरंट बजावूनही नागरिक न्यायालयीन तारखांना हजर राहत नाहीत त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.या बाबीची दखल घेत शिंगम पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अशा नागरिकांची अटक मोहीम हाती घेतली. आणि कायदा व न्यायालयीन बाबींचे सर्वांना महत्त्व कळावे कोणा कडूनही त्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी त्यांनी वॉरंट बाबतीत आखणी केली. आणि यासाठी सहाय्यक फौजदार बाळासाहेब यादव, पोलीस हवालदार बाळू पाखरे व पोलीस जवान दीपक कोल्हे यांची या कामासाठी नेमणुक केली. आणि तालुक्यातील सर्व वॉरंटची जबाबदारी यांच्या वर सोपवण्यात आली.मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत न्यायालयात तारखांना हजर नसलेल्या तब्बल १६ जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तसेच २४ वॉरंटमधील २४ लोकांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना जामीन घ्यावा लागला आहे. कौटुंबिक वादातून विभक्त झालेल्या महिलांना न्यायालायकडून पोटगी मिळवून दिली जाते.मात्र सदरची पोटगी न्यायालयात जमा न करणाऱ्या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.त्यांनी पोटगीची रक्कम भरल्याने पीडित महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे .या वाॅरंट अटक कारवाईच्या धसक्याने अनेक जणांनी स्वतः कोर्टात हजर होऊन आपले वॉरंट रद्द करून घेत आहेत.
अनेकवेळा गुन्हा घडल्यावर न्यायालयाकडून जामीन मंजूर केले जातात मात्र सबंधितांनी तारखांना हजर राहणे बंधनकारक असुनही लोक तारखांना हजर राहत नाहीत. आणि हजर न राहिल्यास काहीच होत नाही असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. मात्र पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी हा गैरसमज दूर करत सुरू केलेल्या अटक मोहिमेमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून कायद्याचा धाक बसला आहे हे मात्र नक्की!