बाभुळगाव जि.प्र.प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गाचा निरोप समारंभ उच्छाहात साजरा.

बाभुळगाव जि.प्र.प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गाचा निरोप समारंभ उच्छाहात साजरा.
जि.प.प्राथ.शाळा बाभुळगाव येथे इ.७ वी च्या वर्गाचा स्नेहपूर्ण निरोप समारंभ संपन्न झाला.अध्यक्ष स्थानी गावच्या सरपंच मा.सौ.मुक्ताबाई गि-हे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्री.थोरात साहेब व सहाय्यक केंद्रप्रमुख श्री.नवाळे सर उपस्थित होते.
यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांना उपसरपंच सौ.राजश्रीताई माने व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी मुलामुलींनी भाषणे केली.सातवीच्या मुलींनी *माझे ध्येय* या विषयावर आपले विचार मांडले. शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.हृदयस्पर्शी. शाळा व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अतूट नात्याचा भावपूर्ण प्रसंग यावेळी अनुभवयास मिळाला.
निरोपाच्या या क्षणी सर्वाचीच मने हेलावली.
सातवीतील कु.गौरी गोरख वाघमारे हिला उत्कृष्ट पाढे पाठांतराबद्दल तर पाचवीतील राहुल लक्ष्मण पाटोळे यास शांत व आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले.
सातवीच्या मुलामुलींनी आपली आठवण म्हणून सुमारे २६०० रु किमतीचा एक पंखा शाळेस भेट दिला.
मा.केंद्रप्रमुखांनी आपल्या भाषणातून देशासाठी काम करा व शाळेचे ,गावाचे व आई वडिलांचे नाव मोठे करा असा संदेश दिला.आईचे महत्व सांगणारे एक गीत साहेबांनी यावेळी गायले.आई व मातृभूमी स्वर्गापेक्षा महान आहेत .त्यांना कधीच विसरु नका असे आवर्जून सांगितले.
गावच्या सरपंच सौ.मुक्ताबाई गि-हे यांनी मुलांना आपले शिक्षण अर्धवट न सोडता जिद्दीने शिक्षण घ्या व आवडीच्या क्षेत्रात नाव कमवा असे आपल्या भाषणातून सांगितले.
या सर्व कार्यक्रामाचे सूत्र संचालन शुभम दत्तात्रय बाचकर या सहावीतील विद्यार्थ्याने केले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रामदास माने व सर्व सदस्य यांनी सातवीच्या वर्गाला पुढिल शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रामाच्या आयोजनाबद्दल शाळेस धन्यवाद दिले.
शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.