कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास अनाप हे होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शाळेच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले. प्राथमिक शिक्षक व्याख्याते गणेश शिंदे यांचे यावेळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, तरुणांना आज जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रप्रेमी विचारांची गरज आहे. त्या विचाराप्रमाणे स्वत:मधे बदल घडवण्यासाठी नवयुवकांनी तयार असावे.ध्येय प्राप्तीसाठी जिद्द, चिकाटी,सातत्य व साहस या गुणांचा अंगीकार प्रत्येकाने करावा.जात, धर्म ,पंथ, भाषा व प्रांत यापलीकडे जाऊन राष्ट्रासाठी काम करावे, हीच खरी देवपूजा.या थोर महात्म्यांचे आदर्श विचार जीवनात उतरवण्यासाठी परिश्रम घ्यावेत असे त्यांनी सांगितले.यावेळी शाळेतील विद्यार्थी चि.अनिकेत आघाव, आर्या मेहेत्रे, नेहा पंडित यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल आपले विचार सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व व आभार धनंजय गिरी यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र घनवट यांनी केले. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका मंजिरी देशपांडे, पर्यवेक्षक पारस जैन, बाल विद्यामंदिर चे मुख्याध्यापक गुलाब मोरे, युवराज भोसले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक