
*पंढरपूर दर्शना नंतर प्रचंड जनसमुदाय अभिवादन करतं होता, घेतलेला निर्णय योग्य याचे हे प्रतीक आळंदीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन*
आळंदी देवाची येथील मृदुंग ज्ञान शिक्षण संस्था आयोजित दासोपंत मृदंगाचार्य यांच्या गुरुपूजन सोहळा, संस्थेचा रौप्य महोत्सव आणि मृदुंग दिंडी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदी आले होते, कार्यक्रमाला येण्याच्या पूर्वी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शन घेऊन महापूजा केली देवस्थानच्या वतीने ॲड, विकास ढगे पाटील यांनी त्यांना सन्मानित केलं प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर तसेच ब्रह्मवृंद च्या मंत्रघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते महापूजा करण्यात आली,या महापूजेला कर्जत रायगडचे आमदार थोरवे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद दादा सोनवणे, हे माऊलींच्या मंदिरात त्यांच्यासमवेत उपस्थित होते ,धर्मवीर आनंद दिघे साहेब हे नेहमी आम्हाला किर्तन प्रवचनाला घेऊन जात असत वारकरी संप्रदाय ही खूप मोठी शक्ती आहे आणि समाजाचा समतोल राखण्यासाठी चुकीच्या गोष्टीला रोखण्यासाठी याची गरज आहे अशी शिकवण धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात दिली, आषाढी वारी वारीच्या पंढरपूर दर्शनानंतर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात वारकरी जनसमुदाय अभिवादन करत होता आणि आम्ही घेतलेल्या निर्णय योग्य असल्याची जाणीव त्यावेळी झाल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले, महाराष्ट्र राज्य शासन हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, तसेच विशेष कृती आराखडा च्या माध्यमातून पंढरपूरला देहू ला विकास झाला त्या धर्तीवर स्वच्छ सुंदर आणि सुविधा पूर्ण आळंदी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले,मृदुंगाचार्य दासोपंत स्वामी यांचा वयाच्या १२ व्या वर्षापासून मृदंग शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेले योगदाना चे त्यांनी कौतुक केले तसेच त्यांना विशेष सन्मानपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, आळंदी इंद्रायणी स्वच्छ करा हे वारकऱ्यांच्या विशेष आग्रही मागणीवर त्यांनी प्रतिक्रिया देत जिल्हाधिकारी आणि आयुक्त पुणे यांना त्याबाबत विशेष सूचना देणार असल्याची सांगितले,वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्काराची संकल्पना आहे आणि ही संप्रदायाची ताकद एक वेगळी शक्ती आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकरी शिक्षण संस्थेचे परमपूज्य मारुती बाबा कुऱ्हेकर यांनी शुभेच्छा देत सुरुवात करण्यात आली ,तर प्रास्ताविक महंत पुरुषोत्तम दादा पाटील यांनी केले या कार्यक्रमाला खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील ,खासदार श्रीरंग बारणे ,माजी आमदार शरद दादा सोनवणे ,कर्जत रायगडचे आमदार थोरवे, तसेच मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय उपस्थित होता, दासोपंत स्वामी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी मृदुंगाचया विशेष कलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि गणेश स्तवन मृदुंग तालीवर त्यांच्या मुलाच्या साथीने सादर केले,तास मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांनी टाळ्या देत या कलेला दाद दिली,