महाराष्ट्र

नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांची अवस्था अत्यंत दयनीय.

 

 नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांची अवस्था अत्यंत दयनीय.

शाळा खोल्यांचा बांधकामासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने दिलेला जिल्हा परिषद शाळांना सुमारे दहा कोटी रुपयाचा निधी गेल्या पाच वर्षापासून पडून असल्याचं सांगत शासन यासाठी वेगळा निधी उपलब्ध करून देणार का अशा आशयाची लक्षवेधी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मांडत ग्रामविकास खात्याचे लक्ष वेधले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही नुकताच पदभार घेतला आहे मी ग्रामीण भागातून येतो मलाही या प्रश्नाची जाण आहे हा राज्यव्यापी प्रश्न असून या संदर्भात लवकरच बैठक घेऊ असे उत्तर दिले नगर जिल्ह्यामध्ये सुमारे 820 शाळा खोल्या आहेत त्यातील अनेक खोल्या मोडकळीस आलेल्या असून ग्रामीण भागातील विद्यार्थी भर पावसात शिक्षण घेत आहे प्रगत जिल्हा असलेल्या भागात अशी अवस्था दुर्दैवी आहे गेल्या एक वर्षात विद्यार्थ्यांच्या पटसंखेत एक ते दहा हजार पटसंख्या वाढली आहे त्यासाठी आणखी वर्ग खोल्यांची गरज निर्माण झाली माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुमारे 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता साईबाबा संस्थाने 10 कोटी रुपयांचा निधी दिलेला असताना तो खर्च झालेला नाही शाळा खोल्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग की जिल्हा परिषद यापैकी कोणी करायचे या वादात नवीन शाळा खोल्यांचे काम रखडले आहे यासंदर्भात राज्य शासनाने निर्णय घेऊन शाळा खोल्याचे काम कोणाला द्यायचे हे ठरवावे रस्ते पुल धरणे या कामासाठी शासन तत्परतेने काम करते मात्र ग्रामीण भागातील शाळा खोल्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते पुढील पिढीसाठी तरी शासन योग्य ती कार्यवाही करणार का असा प्रश्न उपस्थित केला जिल्ह्यातील शाळा खोल्यांचे निर्लेखन करण्यात आले होते अहवालानंतर साईबाबा संस्थाने शाळा खोल्यांसाठी 30 कोटी रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यापैकी दहा कोटी रुपयांचा निधी तसाच पडून राहिला दहा कोटी रुपयांचा निधी खर्च झाला नाही त्यामुळे पुढील 20 कोटी रुपयांचा निधी देवस्थानकडे तसाच राहिला शाळा खोलीसाठी दहा लाख रुपयांचा खर्च येतो मात्र या निधी व्यतिरिक्तही सुमारे ८०० नवीन शाळा खोल्यांचा प्रश्न अनुत्तरीतच राहण्याची चिन्हे आहेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कोणता निर्णय घेतात व निधी कसा उपलब्ध करून शाळा खोल्यांचा भेडसावणारा प्रश्न कसा निकाली काढतात यावर बरेच काही अवलंबून आहे दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आणल्याने समाज माध्यमामध्ये सर्वत्र पसरला.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे