कोरोनाच्या संकटातुन मूक्तता व्हावी याकरीता श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने महायज्ञ

– देशावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे महामारीच्या संकटातून सर्वांची मूक्तता होवू दे या करीता श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने देशभरात सुरु करण्यात आलेल्या लक्षचंण्डी महायज्ञ महोत्सवाची आज सांगता होत आहे बेलापुर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने देखील दिनांक २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान लक्षचंण्डी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते देशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी हा महोत्सव साजरा करण्यात आला होता बेलापुर येथील केंद्रातही श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रिंबकेश्वर पिठाधीश प पू गुरुमाऊली यांच्या अधिपत्याखाली हा मानव कल्याणाचा उपक्रम राबविण्यात आला या कावालधीत दररोज सकाळी आरती हवनयूक्त पाठ दुपारी दुर्गासप्तशती पाठ लक्षचंण्डी महायज्ञअसा उपक्रम दररोज सुरु होता या उपक्रमात ५५ सेवेकरी महीलांनी सहभाग घेतला होता .लक्षचंण्डी महायज्ञमहोत्सव पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले