महाराष्ट्र

आळंदीकरांना पाण्याने फोडला घाम.. नदी उषाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती*

*आळंदीकरांना पाण्याने फोडला घाम.. नदी उषाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती*

 

आळंदीतून माऊलींचे प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा झाला त्यानंतर आज पर्यंत अद्याप आळंदीकरांना पाणी पाहायला मिळालेले नाही एवढ्या मोठ्या सुविधा असून ही भामा आसखेड वरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे लिकेज झाल्यामुळे आळंदीकर पाण्यापासून वंचित राहिले आहे पर्यायाने पुण्याला सुद्धा पाणीपुरवठा झालेला नाही दिनांक सोळा जून रोजी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत लिकेज काढण्याचे काम सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभाग आळंदी नगरपरिषद यांच्याकडून कळवण्यात आले त्यानंतर 16 किलोमीटर लाईन व शेवट करण्यासाठी पाच तासाचा कालावधी लागणार आहे त्यामुळे शहरात पहाटे पाणी मिळण्याची शक्यता असून त्यानुसार वेळापत्रकानुसार गावठाण भागात उद्या सकाळपासून पाणी देण्याचे नियोजन आहे अशी माहिती पाणीपुरवठा विभाग प्रमुख आळंदी नगरपरिषद यांनी दिली आहे परंतु सदर वेळेमध्ये काही बदल होतो का आणि पाणीपुरवठा लिकेज लाईन जी मुख्य स्रोत आहे ती दुरुस्त होण्यास किती विलंब लागत याबाबत शासन काय आणि तसेच आल्यास आळंदीकरांना सलग चौथ्या दिवशी पाण्यापासून वंचित राहावे लागेल यात काही शंका नाही. त्यामुळे नदी उषाला आणि कोरड घशाला अशी आळंदीकरांची परिस्थिती झाल्याचे दिसते उघड्या डोळ्यांनी इंद्रायणी मातेचे पाणी पाहता येते परंतु वापरता मात्र येत नाही अशी दळणे अवस्था आळंदीकर ग्रामस्थांची झालेली आहे अशा परिस्थितीत प्रशासन किती तत्परता दाखवते याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे