राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर संतप्त विद्यार्थ्यांकडून दगडफेक..

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर संतप्त विद्यार्थ्यांकडून दगडफेक..
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर रविवार दि.३१ जुलै रोजी पहाटे १ ते ३ च्या दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून कुलगुरू कार्यालयात आसरा घेतलेल्या दुसऱ्या गटावर दगडफेक करण्यात आली असून प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढुस यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दोन गटामध्ये रात्री दगडफेक झालेने एकच खळबळ उडाली असून घटनेची अधिक माहिती अशी की,
कृषि पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणेसाठी या विद्यापीठात राज्यभरातून व देशातून ऑनलाईन विद्यार्थ्यांची निवड केली जाते,ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना ७० हजार रुपये फी भरावी लागते, या विद्यापीठात एकूण १६८ प्रवेश मर्यादा आहे. तथापि या विद्यापीठाच्या हॉस्टेल मध्ये जवळपास ५०० विद्यार्थी अनधिकृतपणे वास्तव्य करून राहात असून त्यांना कुठली ही हॉस्टेल किंवा मेस फी नाही. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून रात्री वादाची ठिणगी पडली.
अनधिकृत विद्यार्थ्यांची संख्या अधिकृत विद्यार्थ्यांपेक्ष्या जास्त असल्याने अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी हॉस्टेल पासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला.या मुलांना मारण्यासाठी अनधिकृत ५०० विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर जोरदार दगडफेक करीत हल्ला केला, तथापि या कार्यालयाबाहेर कार्यरत सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
घडल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब ढुस यांनी केली असून आमचे प्रतिनिधीशी बोलताना ढुस म्हणाले की, मला पहाटे ३.५५ वाजता काही विद्यार्थ्यांनी फोन केला व घडलेली घटना कथन करून आम्हाला वाचवा अशी विनंती केल्यावरून मी पहाटे विद्यापीठात येऊन पाहिले असता काही विद्यार्थ्यांनी कुलगुरु कार्यालयात असलेल्या सुरक्षा रक्षक गोरकक्षनाथ शेटे यांच्या केबिन मध्ये आसरा घेतला होता, हे विद्यार्थी खूप घाबरलेले होते, आम्हाला वाचवा म्हणत होते, आमचा मर्डर झाला तर त्याला जबाबदार कोण असे विचारीत होते,आम्ही फी भरून परीक्षा देऊन आलो तरी आम्हाला असे चोरा सारखे लपून बसावे लागते अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. तसेच काही विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून घरी निघून जाण्याची भाषा करीत होती. तसेच या विद्यापीठात या ५०० विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या चिरीमिरीसाठी त्यांना संभाळणेत विद्यापीठाचा वेळ वायाजात असून विद्यापीठाचा संशोधन हा मुख्य हेतू त्यामुळे बाजूला पडला असल्याची खंतही हे विद्यार्थीनी बोलून दाखविली असल्याने या सर्व घटनेची मुख्यमंत्री महोदयांनी उच्यस्तरीय चौकशी चे आदेश द्यावेत अशी मागणी ढुस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.