माझ्यावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडील- भारतीय संघाची कप्तान दिव्याची ग्वाही

माझ्यावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडील- भारतीय संघाची कप्तान दिव्याची ग्वाही
बेलापुर (प्रतिनिधी )-कठोर मेहनत प्रचंड सराव आई वडीलांचे व ग्रामस्थांचे आशिर्वाद तसेच पाठबळ शिक्षकांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन त्यामुळेच अशियाई शुटींगबाँल स्पर्धेकरीता भारतीय महीला संघाचे नेतृत्व करण्याची देण्यात आलेली जबाबदारी सर्वांच्या आशिर्वादाने सार्थ ठरवेल असा विश्वास कु दिव्या राजेंद्र पुजारी हीने व्यक्त केला . राहुरी फँक्टरी येथील शिवनेरी क्लबची खेळाडू बेलापूर खूर्दची कन्या दिव्या पुजारी ही पुढील महीन्यात दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु स्टेडीयमवर होणाऱ्या अशियाई शुटींगबाँल स्पर्धेकरीता कर्णधार म्हणून भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी पार पाडणार आहे त्या बद्दल गांवकरी मंडळ बेलापुर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने दिव्या पुजारी हिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या वेळी ती बोलत होती पुढील महीन्यात नवी दिल्ली येथे अशियाई स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत भारतासह श्रीलंका पाकीस्तान बांगला देश नेपाळ यूऐई भूतान हे सात देश सहभागी होत आहे .या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व बेलापुरची कन्या दिव्या पुजारी ही करत आहे त्या बद्दल तीचा सत्कार बेलापुर खूर्द ग्रामस्थ बेलापुर बु!! ग्रामस्थ तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला होता .त्या वेळी मनोगत व्यक्त करताना दिव्या पुजारी पुढे म्हणाली की भारतीय संघाची निवड चाचणी पंजाब मधील भटींडा येथे झाली देशातील २६ राज्यातील खेळाडूंनी त्यात सहभाग घेतला होता .महाराष्ट्र टिमची कप्तान म्हणून खेळताना सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले मला महाराष्ट्र राज्यहौशी शुटींगबाँल संघटनेचे अध्यक्ष मनोहर साळवी उपाध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर सचिव विष्णू निकम भारतीय संघाचे कार्यकारी सदस्य अतुल निकम राज्य संघटनेचे कार्यकारी सदस्य व मार्गदर्शन बाळासाहेब कन्हेरकर जिल्हा सहसचिव दादासाहेब तुपे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे दिव्याने सांगितले या वेळी बोलताना माजी जि प सदस्य शरद नवले म्हणाले कीसध्या मैदानी खेळाचे प्रमाण कमी झाले असुन तरुण पिढी मोबाईल मधील गेमच्या अहारी गेलेली असताना दिव्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीने देशाचे नेतृत्व करावी ही बाब फार मोठी आहे जागतीक स्पर्धेत खेळाच्या बाबतीत आपला देश मागेच रहातो आपल्या देशात खेळाडूंना कमी प्रमाणात सोयी सवलती दिल्या जातात शासनाने खेळाडूंना सर्व सोयी सवलती दिल्या तर अनेक दर्जेदार खेळाडू तयार होतील दिव्या ही या स्पर्धेत देशाला पदक मिळवून देईल आसा विश्वास नवले यांनी व्यक्त केला या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई आदिंनी मनोगत व्यक्त केले