महाराष्ट्र

स्वातंत्र्य चळवळीत मदनलाल धिंग्रा यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या केलेल्या हत्ये मागे सावरकरांचा असलेला संबंध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार यामागे असल्याचे हिन मत व्यक्त करणाऱ्या गांधीचा प्रत्येक भारतीयांनी विचार सुद्धा केला नाही पाहिजे असे परखड आणि रोखठोक मत राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भैय्या बेग

*श्रीरामपूर(प्रतिनिधी): स्वातंत्र्य चळवळीत मदनलाल धिंग्रा यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या केलेल्या हत्ये मागे सावरकरांचा असलेला संबंध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार यामागे असल्याचे हिन मत व्यक्त करणाऱ्या गांधीचा प्रत्येक भारतीयांनी विचार सुद्धा केला नाही पाहिजे असे परखड आणि रोखठोक मत राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भैय्या बेग यांनी मांडले आहे.

स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीनकार्याचा खरा खुरा उलगडा भारतीयांना व्हावा म्हणून निर्मित केलेला सावरकर हा चित्रपट श्रीरामपूर येथे राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने महिला मुली व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोफत शो किशोर चित्रपट गृहात ठेवला होता त्याप्रसंगी उपस्थित प्रेक्षकांसमोर बोलतांना सागर भैय्या बेग पुढे म्हणाले की,भारताला स्वातंत्र्य हे चरखा फिरवून नाही मिळाले आपल्या असंख्य क्रांतिविरांच्या बलिदानामुळे भारताला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेता आला आहे.सावरकर व छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील म्हणून शिवाजी महाराजांचे विचार सावरकरांमध्ये असल्याचे हिन विचार मदनलाल धिंग्रा यांनी इंग्रजाच्या केलेल्या हत्येमागे सावरकरांचा हात असल्याच्या संशयाने गांधींनी तसे विचार ..*”सावरकर एक घटनेमधील गुंड”…* या पुस्तकात व्यक्त केले होते. गांधीचे ते विचार निषेधार्थ असे आहे.आजपर्यंत नेहरू आणि गांधी यांनाच थोर स्वातंत्र्यसेनानी म्हणून बळजबरीने दाखवण्यात आले आणि खरे क्रांतिकारांना पडद्या आड झाकून ठेवले होते ते आता उघड होत आहे.

 

सावरकरांचा सत्य जीवन पटावर आधारित सावरकर हा चित्रपट शासनाने टॅक्स फ्री करण्याची मागणीही याप्रसंगी सागर बेग यांनी केली आहे.

सावरकरांविषयी माहित नसलेल्या अनेक गुप्त गोष्टींचा उलगडा या चित्रपटाच्या माध्यमातून झाल्याचे मत महिलांनी मांडले तर सावरकराविषयी खूप मोठ्याप्रमाणात खोटा इतिहास पसरवण्यात आलेला होता तो सांगण्यात आलेला इतिहास या चित्रपटामुळे खरोखरच खोटा होता विद्यार्थ्यांनी आपल्या भावना यावेळी अशाप्रकारे व्यक्त केल्या.
लव जिहाद या ज्वलंत विषयावर आधारित असलेला केरला फाईल्स हा चित्रपट सुद्धा राष्ट्रीय श्रीराम संघाने मोफत ठेवून हिंदू मुलींना जागरूक केलं आहे.

 

काल दुपारी तीनच्या शो दरम्यान राष्ट्रीय श्रीराम संघाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहून याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चित्रपट संपे पर्यंत जागरूकतेने त्याठिकाणी उपस्थित माता भगिनींच्या रक्षणासाठी उभे होते.

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे