शेतकऱ्यांच्या खात्यावर २००, ५००, ७०० अशी तुटपुंजी रक्कम जमा

शेतकऱ्यांच्या खात्यावर २००, ५००, ७०० अशी तुटपुंजी रक्कम जमा
सतत च्या पावसाने जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील (सोयाबीन,कापूस,मका) आदी पिकांचे प्रचंड नुकसान होऊन हाता तोंडाशी आलेला घास धुळीस मिळाल्याने शेतकरी पुरता हैराण झाल्याने बळीराजा दिवाळी करू शकला नाही बहुसंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता नुकसानीच्या तक्रारी नोंदविल्या तरी विमा कंपनीने ढुंकून ही पाहिले नाही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर २००, ५००, ७०० अशी तुटपुंजी रक्कम जमा करून भरदिवाळीत बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळून क्रूर चेष्टा केली तालुका कृषी विभागानेही सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याने शेतकरी मेटाकुटीस आला सरकारने ही दमडीचीही मदत केली नाही त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आलहुजी कानडे साहेब यांचे बंधु माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली सरकार, कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना घेरावो घालून जाब विचारला या प्रसंगी तहसीलदार श्री.प्रशांत पाटील साहेब यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या अशोक कानडे यांनी आक्रमक होऊन इशारा देताच ऑफिसमध्ये ए. सी. गार हवा अंगावर घेत बसलेले तालुका कृषी अधिकारी .अशोक साळी, नलगे कडक उन्हात बसलेल्या शेतकऱ्यां मध्ये येऊन बसले तहसीलदार साहेब यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यां समोरच फैलावर घेऊन येत्या सोमवारी संबंधित अधिकारी आणि विमा कंपनीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांची बैठक बोलाविली आहे.
या प्रसंगी डॉराशीनकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची अंत्ययात्रेचे वास्तव चित्र प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सादर करून पुढील प्रमाणे घोषणा देऊन उपस्थितांची मने हेलावून टाकली,
भामट सरकार लबाड हाय, गुहाटीच घबाड हाय.
थोडी इज्जत लाज धरा, ओला दुष्काळ जाहीर करा.
कर्ज माफीचे ढोंग नको, चुकीचा आकस निकष नको.
कष्ठाळू राजा इमानदार हाय, आत्महत्येला सरकार जबाबदार हाय.
या आंदोलन प्रसंगी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस .ज्ञानेश्वर मुरकुटे (माऊली).सदा कराड, .समीनभाई बागवान, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष.राजेंद्र कोकणे, आदी शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आपल्या व्यथा मांडून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले