राजकिय

राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार तनपुरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित

राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार तनपुरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित

राहुरी, नगर व पाथर्डी मतदार संघातील जनतेने मला केवळ आमदार होण्यासाठी भरभरून मते दिली. परमेश्वराची कृपा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठबळाने सहा खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले. अडीच वर्षात राज्यातील प्रश्न कसे सोडवायचे हे मला चांगलेच समजले आहे. मला सत्तेची नाही तर माझ्या मतदार संघातील जनतेची काळजी आहे. कोणतेही विकास कामे थांबणार नाही याची ग्वाही देतो. पुढील काळ हा राहुरी मतदार संघातील जनतेसाठीच असेल असे मत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

 

राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार तनपुरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी गंगाधर जाधव हे होते. व्यासपिठावर साई संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, हर्ष तनपुरे, रोहिदास कर्डिले, संभाजी पालवे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, सिताराम काकडे, पोखर्डीचे सरपंच रामेश्वरन, अभिषेक भगत, दीपक झोडगे, महेश झोडगे, संतोष पटारे, संतोष धाडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब भिटे, तनपुरे कारखाना संचालक भैयासाहेब तारडे, विजय डौले, किरण कडू, सुरेश निमसे, नगरसेवक आण्णासाहेब चोथे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रभाकर गाडे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, किसन जवरे आदी उपस्थित होते.

                     आ. तनपुरे म्हणाले की, राहुरी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी खचलो होतो. आमदारकी मिळणार याची खात्री नव्हती. परंतु अर्ज भरताना जो प्रतिसाद लाभला तोच माझ्यासाठी सर्वस्व ठरला. देवाकडे फक्त आमदार व्हावे अशी प्रार्थना केली होती. परंतु देवाने मला आमदारकीसह नामदारकी दिली. सहा खाते सांभाळताना तत्कालिन सेना पक्षाचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे व उदय सामंत यांनी मोठे सहकार्य केले हे प्रमाणिकपणे सांगतो. काँग्रेस पक्षाकडून अपेक्षित सहकार्य लाभले नाही. प्रशासकीय कामकाजाचा कोणताही अनुभवन नसलेले व कधीच खासदार व आमदार न झालेले उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांनी कोरोना सारखा कालखंडा हाताळत राज्यातील जनतेचे प्राण वाचविले. त्यांच्या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. पदाचा गर्व न बाळगता सदैव आपुलकीने वागणारे सेना प्रमुख ठाकरे यांना बंडखोरांनी सोडून जाणे हे जिव्हारी लागणारे आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना पवार कुटुंबियांचे मोठे पाठबळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी जोमाने काम करणार आहे. राहुरी मतदार संघामध्ये उर्जा खात्याच्या माध्यमातून सबस्टेशन, वीज रोहित्राचे मोठे जाळे निर्माण केले. शेतकर्‍यांसह औद्योगिक व सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे. शहरातही भरीव कामे केलेले आहेत. चार वर्षात महाविकास आघाडी शासन कोसळेल अशी मलाही शंका होती. त्यामुळेच कामांना गती देत विकास कामे चार वर्षाच्या आत पूर्ण करणार होतो. परंतु विधानपरिषदेच्या निकालाने सेना पक्षात बंडखोरी झाली. शासन अडीच वर्षात कोसळल्याने विकास कामांना ब्रेक लागल्याची चर्चा आहे. परंतु कोणीही चिंता करू नये. मी अजूनही लोकप्रतिनिधी आहे. निधी कसा आणावा हे मला चांगले ठाऊक आहे. कोणत्याही विकास कामांना ब्रेक लाणार नाही. सर्व कामे मार्गी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठे यश मिळवावे लागणार आहे. मंत्रीपदाची भर आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काढायची आहे. कार्यकर्त्यांनी तयारीला लागा. पक्षात राहून कोणी बंडखोरी करत असेल तर खपवून घेणार नाही. अनेक जण पक्षात येण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा उंचावण्यासठी मी सर्वस्व प्रयत्न करणार असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले.

याप्रसंगी ज्ञानदेव बाचकर, रामदास बाचकर, पं.स.सदस्य रविंद्र आढाव, अ‍ॅड. राहुल शेटे, पं स उपसभापती प्रदीप पवार. शेतकरी संघटनलेचे प्रकाश देठे, आप्पासाहेब जाधव, सिताराम काकडे सर, नवाज देशमुख, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, पिंपळगाव उज्जैनीचे सरपंच नाथा चव्हाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी ताराचंद तनपुरे, बाळासाहेब उंडे, नंदकुमार तनपुरे,भारत भुजाडी. श्रीराम गाडे, सुर्यकांत भुजाडी, रवि आहेर, अशोक खुरूद,अरूण ढूस, दीपक त्रिभूवन, जीवन गुलदगड, संतोष आघाव,महेश उदावंत,अशोक आहेर,अशोक साळवे आदी कार्यकर्त्यांसह महिलांची उपस्थिती होती.

—-

 

 

दादा,मीच मंत्री म्हणून मिरवणार्‍यांपासून सावध व्हा

—-

 माजी राज्यमंत्री तनपुरे हे मतदार संघात अनुपस्थित असताना मीच मंत्री म्हणून काही जण लोकांमध्ये गैरसमज निर्मण करीत होते. संबंधितांच्या वागणुकीमुळे त्याचा फटका बसू नये याची काळजी आ. तनपुरे यांनी घ्यावी. कार्यकर्ते व जनतेशी प्रत्यक्ष संबंध ठेवत आ. तनपुरे यांनी आगामी काळात यशाला गवसणी घालावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी बैठकीत कली.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे