भगवान गडाचा मी वाचमन, गडा पेक्षा पंकजा मुंडे यांना लोकांच्या आशीर्वादाची गरज*

*विज्ञान जाणतो तो संत आहे*
*भगवान गडाचा मी वाचमन, गडा पेक्षा पंकजा मुंडे यांना लोकांच्या आशीर्वादाची गरज*
*महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी मांडली भूमिका*
भगवान गड, संतश्रेष्ठ भगवान बाबांचा गड आहे. हा गड नामदेव शास्त्रीचा नाही. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आग्रहा मुळे गडावर आलो. मी, केवळ गादीचा सेवेक आहे. वाॅचमन आहे. मालक नाही. बाबांच्या दर्शनाला कुणी ही येऊ शकतो. अगदी, पंकजाताई मुंडे यांनी ही यावे, काहीच हरकत नाही. त्या येतातच गडावर दर्शनाला. त्यांनी मनोभावे यावे. कुणीची ही हरकत नाही.
ना. धनंजय मुंडे गडाचे शिष्य आहेत. ते येतात आणि दर्शन करून जातात. त्यांनी गडाला एक कोटीचे दगड दिले. पंकजा मुंडे ही गडाच्याच आहेत. आमच्या मनात किंतू-परंतू नाही. आकस नाही.
मात्र, त्यांना गडाने नव्हे तर मतदारांनी स्वीकारले पाहिजे. अशी जाहिर भूमिका भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी येथे मांडली.
शनिवार ता. 23 रोजी रात्री नऊ वाजता आयोजित करण्यात आलेल्या एबीपी वाहिनीवरच्या [ माझा कट्टा ] मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान, ज्याला विज्ञान कळते,समजते आणि उमजते, तोच खरा संत आहे. विज्ञानाच्या कसोटीवर संत समाजात कधीही अंधश्रद्ध पसरवू शकत नाहीत. असा विचार ही संतश्रेष्ठ भगवान गडाचे मठाधिपती, न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी मांडून, विविध विषयांवर उदाहरणासह स्पष्टीकरण देत ज्ञानेश्वरी मध्ये 90% विज्ञानाचा अंतर्भाव असून, ज्ञानेश्वरी आत्मसात करण्याचा आग्रह धरला. जीवनाचे सार्थक करण्याची गरज म्हणून का होईना, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे.
ते म्हणाले की, मी, घरात एकुलता एक मुलगा. मुलाने आध्यात्मिक व्यासपीठावर जावे, आईची इच्छा होती. वडील वारकरी होते. वयाच्या विसाव्या वर्षी ज्ञानेश्वरी पाठ केली. अभ्यास केला. गुरुकुल पद्धतीत शिक्षण केले. 1978 साली वारकरी संस्थेत प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी व्यक्त करून, ते म्हणाले की, भगवान गड ऊसतोड कामगारांनी सजवलाय. मी केवळ आणि केवळ गडाचा वाचमन आहे. माझे काहीही नाही. गडाचे राखण करत असल्याचे त्यांनी सांगितले. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी गडाला जागा दिल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख ही डॉक्टर शास्त्री यांनी केला.
चित्त स्थिर ठेवून माणसांनी कार्यरत राहील्यास, ताणतणाव कमी होत जातात. संत विचार समाजाचे हित जोपासून काम करतात. त्यांनी राजकीय वर्तुळात यावे-जावे. मात्र , राजकारणी होऊ नये. अलीकडच्या काळात, राजकीय वर्तुळात खोट बोलणारे राजकारणी लोक आलेत. आयुष्यात खर बोलता येत नाही म्हणून ते राजकारणात येतात का ? असा प्रश्न पडतो. विंचवाच्या नांगीने गुदगुल्या झाल्या तरच ते खर बोलतील, अशी मिश्किल टिप्पणी करून, ते म्हणाले की, जगभरात भगवान गडाचे 20 [वीस] लाख शिष्य आहेत. त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. गडावर ऊसतोड मजूर कामगार म्हणून कष्ट करणाऱ्या भक्तांनी प्रचंड प्रेम केलय. त्यांनी 7 – 7 [ सात- सात ] टनाचे तीन दगड दिलेत. ना. धनंजय मुंडे यांनी ही एक कोटी रुपयांचे दगड दिलेत. गडावर ज्ञानोबारांच्या मंदिर उभे राहते आहे. संत जनाबाई यांनी सांगितलय, वाचावा ज्ञानेश्वरी. या अर्थाने, ज्ञानेश्वरी ने विचारावर विचार करायला सांगणारी ज्ञानेश्वरी जगातला सर्वोत्तम ग्रंथ असल्याचा उल्लेख ही शेवटी डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी केला.