लवजिहादच्या विरोधात कडक कायद्याची ओवाळणी मिळावी म्हणून “राखी धर्मरक्षणाची… कायद्याची मागणी भगिनींची”

लवजिहादच्या विरोधात कडक कायद्याची ओवाळणी मिळावी म्हणून “राखी धर्मरक्षणाची… कायद्याची मागणी भगिनींची”
श्रीरामपूर (प्रतिनिधी):- लवजिहादबाबत जागरूकता होऊनही काही ठिकाणी आजही हिंदू मुली लवजिहादच्या बळी पडत आहेत. लवजिहाद हा अघोरी प्रकार कायमचा थांबावा म्हणून या रक्षाबंधनला बहिनींना लवजिहादच्या विरोधात कडक कायद्याची ओवाळणी मिळावी म्हणून “राखी धर्मरक्षणाची… कायद्याची मागणी भगिनींची”…सकल हिंदू समाजाचा हा उपक्रम तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन राबवण्यात आला.
सकल हिंदू समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात लवजिहाद विरोधी कायद्यात एकूण पाच तरतुदी व महिला सुरक्षतेचे काही सुचक मुद्दे मांडण्यात आले आहेत.ओळख लपवून केलेल्या विवाहस गुन्हा ठरवणे तो विवाह बेकायदेशी ठरवणे अशा व्यक्तीस कठोर शासन व्हावे, धर्मांतरासाठी फसवणूक प्रलोभन धमकी किंवा दबाव वापरणे गुन्हा ठरवणे, ऐच्छिक धर्मांतरासाठी न्यायालयाची पूर्वपरवानगी आवश्यक करणे,लव जिहाद घटनेच्या तपासासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपास यंत्रणा स्थापन करावी,लवजिहाद पीडित महिलांना व मुलींना संरक्षण व पुनर्वसन सामाजिक व कायदेशीर मदतीसाठी स्वतंत्र महिला सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात यावी अशा पाच प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या असून महिला सुरक्षतेचे महत्व या मुद्द्यावर काही सूचक असे मुद्देही प्रशासनाच्या निदर्शनास या निवेदनाद्वारे आणण्यात आले आहेत.
महाविद्यालयीन मुलींनी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पाउळ व विभागीय पोलीस अधिकारी शिवपुजे यांनी यांना निवेदन दिले. याप्रसंगी सकल हिंदू समाजाच्या वतीने महाविद्यालयीन मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.


