
टाकळीभान—बेलपिंपळगाव रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे.
थोरात – बोडखे वस्तीपर्यंत रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्रभाग क्रं.४ व ५ मधून बेलपिंपळगावकडे जाणार्या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून सदर काम दर्जेदार करण्यात येवून ते थोरात—बोडखे वस्तीपर्यंत करण्यात यावे. अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
टाकळीभान—बेलपिंपळगाव रस्त्याची गेली कित्येक दिवसापासून वाताहत झाली आहे. येथील प्रभाग क्रं.४ व ५ मधून जाणारा हा रस्ता थोरात—बोडखे वस्तीपर्यंत अंत्यत खराब झालेला आहे. कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आ.लहु कानडे यांच्या निधीतून या कामास मंजूरी मिळाली. प्रत्यक्षात कामास सुरूवात झाली असली तरी या कामासाठी वापरले जाणारी खडी दर्जाहीन असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर या रस्त्याला लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने थोरात— बोडखे वस्तीपर्यंत या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. मात्र सध्यस्थितीत ते काम लक्ष्मीवाडी पर्यंतच होणार असल्याणे परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. तरी थोरात—बोडखे वस्तीपर्यंत या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी तुकाराम बोडखे, अनिल बोडखे, उमेश त्रिभूवन, अजित थोरात, बंडू वेताळ, सुनिल बोडखे, अशोक वेताळ, बाळासाहेब शेळके, द्वारकानाथ बोडखे, सुभाष येवले, राजेंद्र बोडखे, जालिंदर वेताळ, किरण बोडखे, रमेश येवले, सुनिल त्रिभूवन, माजी ग्रा.पं.सदस्य नानासाहेब रणनवरे, बंडू बोडखे, आदींनी केली आहे.
— टाकळीभान—बेलपिंपळगाव प्रभाग क्रं. ४ व ५ मधून जाणार्या रस्त्याचे काम हे पाहणी करताने निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे निर्दशनास आले. या कामासाठी दर्जेदार खडी वापरणे गरजेचे आहे. मात्र याठिकाणी विहीरीवरील डबर आणून काम सुरू होते. अशा प्रकारे निकृष्ठ दर्जाचे काम कदापी होवू दिले जाणार नाही. त्यामुळे सध्यस्थितीत ते बंद करण्यास सांगीतले आहे. संबधित विभागाचे अधिकारी आल्यावर दर्जेदार काम करण्याच्या बोलीवरच कामास सुरूवात केली जाणार असल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगीतले.
Rate this post