दैनंदिन नवचैतन्याचा उर्जा स्त्रोत असणार वृत्तपत्र हे लोकशाहीचा तिसरा नेत्र*

*दैनंदिन नवचैतन्याचा उर्जा स्त्रोत असणार वृत्तपत्र हे लोकशाहीचा तिसरा नेत्र*
सामाजिक पातळीवर विश्वासार्हता टिकवण हे सगळ्यात मोठं आव्हान असत. आणि हेच कठिण आव्हान सहज पेलवत दैनंदिन वेगवेगळ्या वयोगटातील वाचकांच्या पसंतीस उतरलेली वृत्तपत्र हि दैनंदिन जीवनात नव चैतन्य निर्माण करणार माध्यम आहे. जे सत्याचा वाली, न्यायाचा आधारस्तंभ लोक भावनांच प्रतिक जनमनाचा आरसा उत्कृष्ट शब्दांचा खजाना प्रंचड उर्जा स्त्रोत, म्हणून आपण त्या कडे खुप मोठ्या आशेने पाहतो. हिच आशा अपेक्षा पुर्ण करत कसोटीवर खरं उतरण्याची किमया करत वृत्तपत्राने जगातिक पातळीवर आपलं स्वतःचं एक वेगळ असं स्थान निर्माण केलं आहे. त्याच बरोबर हे स्थान दैनंदिन उंची गाठत असताना लोक अपेक्षेवर खरं उतरत आहे. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक व लोक चळवळ गतिमान करण्याचं माध्यम म्हणून वृत्तपत्रा कडे पाहिलं जातं. हे समाजाला योग्य दिशा देणार माध्यम असल्याने आपल्या दिवसाची सुरुवात हि आपण सकाळी सकाळी झोपेतून उठल्या बरोबर अगोदर चहा कॉफी नास्ता न करता प्रथम वृत्तपत्र वाचतो. अथवा नास्ता करताना वृत्तपत्र वाचल्याशिवाय सकाळी सकाळी चैतन्य युक्त वाटत नाही. हे वास्तविक सत्य असुन हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. कितीही महत्वाचं काम असु द्या किमान वृत्तपत्रावर नजर टाकल्या खेरीज आपला दिवस पुर्ण होत नाही. म्हणजे मानवी जीवन आणि वृत्तपत्र यांच परस्परांशी किती घनिष्ठ नाते संबंध आहे. हे या सगळ्या घडामोडींमुळे स्पष्ट होत. दिवसभरात वृत्तपत्र वाचलं नाही असा कोणीही व्यक्ती शोधून सापडणार नाही. म्हणजे मानवी जीवनातील वृत्तपत्राच अनन्यसाधारण असं महत्व आहे. एकंदरीत दिवसाची सुरुवात करणार वृत्तपत्र हे दैनंदिन जीवनात एक नवी ऊर्जा प्रदान करत चैतन्य निर्माण करणार ठरत. वृत्तपत्र हे लोकशाहीचा तिसरा नेत्र असला तरी हा नेत्र सदैव गतीशील राहण्यासाठी ज्यांच अनमोल योगदान असतं ते आधारस्तंभ संपादक, सहायक संपादक, प्रतिनिधी, वार्ताहर, पत्रकार हे अनमोल रत्न वृत्तपत्र चालण्यासाठी योगदान देत असतात. तर वाचक वर्ग हा वृत्तपत्राच्या कार्याला प्रोत्साहान देत असतो. वृत्तपत्र समुहात कार्यरत सर्व अनमोल रत्न यांच्या सगळ्यांच्या प्रचंड मेहनतीने नावारूपाला येणार वृत्तपत्र हे लोक जागृती करणार उत्तम माध्यम ठरत असत. आपल्या देशातील धार्मिक परंपरेनुसार फक्त सृष्टीचे संहारक भगवान महादेव यांना तिसरा नेत्र आहे. आणि एकादा का तिसरा नेत्र उघडला कि मग कोणाचीही खैर नाही. तसंच जागतिक पातळीवर कोणत्याही क्षेत्रातील विषयाच्या अनुषंगाने एकदा का एखादा वृत्तपत्र सत्याचा वेध घेण्यासाठी सरसावल तर मग त्या समोर कोणीही असो त्याची खैर नाही आणि न्याय मिळेपर्यंत वृत्तपत्र आपली जबाबदारी आणि कर्तव्य निष्ठापूर्वक पुर्ण करत राहतं त्या मध्ये मागे हटणे हा विषयच राहत नाही. म्हणून जगातिक पातळीवर लोकशाहीचा तिसरा नेत्र म्हणून आपण वृत्तपत्रा कडे पाहतो. देशाच्या पातळीवर असो जागातीक पातळीवर लोकशाही मुल्य लोकांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असणार माध्यम म्हणून आपण ज्या कडे पाहतो ते वृत्तपत्र म्हणजे लोकाशाहिचा तिसरा नेत्र आहे. या मध्ये काही शंका नाही. याच वृत्त पत्राचे नाव लौकीक करण्यासाठी बाब छोटी असो कि मोठी पण त्याच्या मुळाशी जाऊन अगदी वेळ प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून वृत्तांकान करणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांचा कडे आदराने पाहतो ते व्यक्तिमत्व म्हणजे पत्रकार असल्याने जगाच्या दृष्टीने मानवी मुल्य अधिकार न्याय,या दृष्टीने खुप महत्वपूर्ण आहे.जगातीक पातळीवर सुद्धा मानवता मानवी अधिकार, लोकशाही समता, प्रस्थापित करण्या बरोबरच जगातीक पातळीवर शांतता अबाधित राखण्यासाठी पत्रकारिता हे खुप महत्वाचे माध्यम असल्याने पत्रकार हे निष्पक्ष निर्भिड, आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील अत्यन्त बारीकसारीक बाबींचा वेध घेत अहोरात्र स्वतःच जीवन लोक कल्याण लोक जागृती व लोकशाहिच्या रक्षणासाठी समर्पित करत असतात. लोकशाही मध्ये तिसरे नेत्र असणार वृत्तपत्र मजबुती ने टिकविण्यासाठी त्याचे मजबुत खांब म्हणून सन्माननीय संपादक, पत्रकार, वृत निवेदक हे खुप महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत त्या माध्यमातून तिसरा नेत्र मजबूत करण्यासाठी अहोरात्र धडपड करत असतात. मानवी मनाला चैतन्य देण्या बरोबरच एक उत्तम विरंगुळा म्हणून आपल्या सगळ्यांच्या आवडीच माध्यम असणार वृत्तपत्र आणि आज या वृत्तपत्राचा जगातिक पातळीवर स्वातंत्र्य दिन आहे. त्या निमित्ताने सर्व दैनिक वृत्तपत्र मा संपादक मा सहायक , संपादक, दैनिक प्रतिनिधी, वार्ताहर,वाचक यांना मनापासून शुभेच्छा