राजकिय

तिळापुर सरपंच पदी कावेरी जाधव यांची बिनविरोध निवड

तिळापुर सरपंच पदी कावेरी जाधव यांची बिनविरोध निवड

 

राहुरी तालुक्यातील तुळजापूर ग्रामपंचायत तीन वर्षापूर्वी निवडणूक पार पडली होती. त्यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी सरपंच उपसरपंच पदे काही दिवसांसाठी ठरवून घेतले होते. त्यानुसार टर्म आल्याने सुशिक्षित सदस्य सौ कावेरी संदीप जाधव यांच्या नावाची चर्चा सरपंच पदासाठी चालू होती.

               सरपंच बापूसाहेब आघाव यांनी त्यांच्या कालावधी संपल्याने सरपंच पद हे रिक्त होते. आज 7 फेब्रुवारी रोजी सरपंच निवड प्रक्रियेची सर्कुलर आले. त्यानुसार आज सकाळी प्रशासकीय निवडणूक अधिकारी म्हणून, मंडल अधिकारी सौ आघाव व तलाठी सौ सोनवणे मॅडम यांनी काम पाहिले. सरपंच पदासाठी एकमेव सौ कावेरी संदीप जाधव यांचा फॉर्म आल्याने दिलेल्या वेळेत दुसरा अर्ज आला नसल्याकारणाने एकमताने सरपंच म्हणून सौ कावेरी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मंडलाधिकारी सौ आघाव तलाठी सौ सोनवणे पोलीस नाईक अमित राठोड व तिळापुर ग्रामस्थ उपस्थित होते

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे